शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाकर समाजबांधव आक्रमक-: जातवैधता प्रमाणपत्राबाबत तक्रार

By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST

आंदोलन छेडण्याचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तरीही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे १० आॅगस्ट २०१४ पर्यंत तपासणी समितीत जातवैधता देण्यास भाग पाडावे अन्यथा ११ आॅगस्टपासून जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष साबाजी बाबुराव मसके यांनी शासनास दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेत निवेदन सादर केले. सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९७६ च्या घटना आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तथापी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही घटनाविरोधी गंभीर बाब आहे. तपासणी समितीच्या या आडमुठ्या धोरणामुळे ठाकर समाजातील ज्ञातीबांधवांचे अतोनात नुकसान होत आहे. तरुण सुशिक्षित तरुणांची शासनाच्या सेवेत निवड झालेली असून जातवैधता प्रमाणपत्र अभावी त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत. काही ज्ञातीबांधवांच्या पदोन्नती रोखण्यात आलेल्या आहेत. तर काही ज्ञातीबांधवांना तीस तीस वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना सेवेतून का कमी करण्यात येवू नये अशा नोटीसा देऊन त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. ही ठाकर समाजाची पिळवणूक आहे. या अन्यायाविरोधात वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन दरबारी तयाची दखल घेतली जात नाही. १० आॅगस्टपूर्वी तपासणी समितीस जातवैधता देण्यास भाग पाडावे. जिल्ह्यातील ठाकर समितीवर होणारा अन्याय दूर करून न्याय द्यावा अन्यथा ११ पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) -..अशी असेल आंदोलनाची रूपरेषा११ आॅगस्ट रोजी सकाळी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण मोर्चा नेणे व ६ वाजेपर्यंत उपोषणास बसणे- त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १४ आॅगस्टपर्यंत सकाळी उपोषणास बसणे. - १४ रोजीपासून जिल्हा कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणे.- १५ व १६ आॅगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने ठाकर समाज काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. त्याचदिवशी सभासद मुंडण करून जिल्हा कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देणार आहेत. आवश्यकता भासल्यास रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.