शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

ठाकर समाजबांधव आक्रमक-: जातवैधता प्रमाणपत्राबाबत तक्रार

By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST

आंदोलन छेडण्याचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तरीही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे १० आॅगस्ट २०१४ पर्यंत तपासणी समितीत जातवैधता देण्यास भाग पाडावे अन्यथा ११ आॅगस्टपासून जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष साबाजी बाबुराव मसके यांनी शासनास दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेत निवेदन सादर केले. सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९७६ च्या घटना आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तथापी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही घटनाविरोधी गंभीर बाब आहे. तपासणी समितीच्या या आडमुठ्या धोरणामुळे ठाकर समाजातील ज्ञातीबांधवांचे अतोनात नुकसान होत आहे. तरुण सुशिक्षित तरुणांची शासनाच्या सेवेत निवड झालेली असून जातवैधता प्रमाणपत्र अभावी त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत. काही ज्ञातीबांधवांच्या पदोन्नती रोखण्यात आलेल्या आहेत. तर काही ज्ञातीबांधवांना तीस तीस वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना सेवेतून का कमी करण्यात येवू नये अशा नोटीसा देऊन त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. ही ठाकर समाजाची पिळवणूक आहे. या अन्यायाविरोधात वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन दरबारी तयाची दखल घेतली जात नाही. १० आॅगस्टपूर्वी तपासणी समितीस जातवैधता देण्यास भाग पाडावे. जिल्ह्यातील ठाकर समितीवर होणारा अन्याय दूर करून न्याय द्यावा अन्यथा ११ पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) -..अशी असेल आंदोलनाची रूपरेषा११ आॅगस्ट रोजी सकाळी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण मोर्चा नेणे व ६ वाजेपर्यंत उपोषणास बसणे- त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १४ आॅगस्टपर्यंत सकाळी उपोषणास बसणे. - १४ रोजीपासून जिल्हा कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणे.- १५ व १६ आॅगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने ठाकर समाज काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. त्याचदिवशी सभासद मुंडण करून जिल्हा कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देणार आहेत. आवश्यकता भासल्यास रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.