शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ठाकरे गट अस्वस्थ, भाजप झालाय बेशिस्त; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींनंतरची कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

By समीर देशपांडे | Updated: September 12, 2023 14:01 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : शिवसेनेतील ठाकरे गट अस्वस्थ आणि भाजप झालाय बेशिस्त असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. दोन्ही पक्षांतील ...

समीर देशपांडेकोल्हापूर : शिवसेनेतील ठाकरे गट अस्वस्थ आणि भाजप झालाय बेशिस्त असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी याला कारण ठरल्या आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच यानिमित्ताने दिसून आले आहे.विजय देवणे यांची जिल्हाप्रमुख पदावरून करण्यात आलेली उचलबांगडी त्यांना झोंबली . पण ते संघटना सोडून जातील असे वाटत नाही. सुनील शिंत्रे यांच्या निवडीने ते अस्वस्थ झाले हे निश्चित. शिंत्रे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत असले तरी त्यांच्या मामी अंजना रेडेकर या काँग्रेसमधील सक्रिय नेत्या आहेत. शिंत्रे यांनी गडहिंग्लज बाजार समितीमध्ये शिवसेनेतून तिकीट न मिळाल्याने काँग्रेसमधून पत्नीसाठी संचालकपद मिळवल्याने देवणे यांनी याबाबत तक्रार केली होती. याचदऱम्यान देवणे यांच्याही कार्यपध्दतीबाबत तक्रारी झाल्या आणि शिंत्रे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. म्हणजेच वरिष्ठांनी शिंत्रेंनाच पाठबळ दिले.दुसरीकडे हातकणंगले सहसंपर्कप्रमुखपद वंचितमधून शिवसेनेते आलेले हाजी अस्लम सय्यद यांना दिल्याने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव संतप्त झाले आहेत. त्यांनी त्याच दिवशी तीन नेत्यांना नाराजी कळवली. परंतु जाधव यांना ‘गाेकुळ’सारखे सहजासहजी न मिळणारे पद दिल्यानंतर आता त्यांचे फार काही ऐकून घेतले जाईल असे वाटत नाही.चार दिवसांपूर्वी भाजप महानगरची एक आणि ग्रामीणच्या दोन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर पहिला नाराजीचा बॉम्ब आजऱ्यात फुटला. सात वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या अशोक चराटी गटाचे अनिरुद्ध केसरकर यांना तालुकाध्यक्षपद दिल्याने भाजपचे जुने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी हा संताप थेट कार्यालय बंद करून, फलक काढून, कमळ चिन्हावर पांढरा रंग लावून व्यक्त केला. यातील सुधीर मुंज आणि मलिक बुरुड हे गेली चाळीस वर्षे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत आहेत. परंतु पाटील यांच्याकडून कामे होत नाहीत असा आरोप करत, शिवाजी पाटील यांना चंदगडमधून पाडायलाही ते कारणीभूत आहेत, असा आरोप करत अरुण देसाई यांनी खळबळ उडवून दिली.गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ नेते बाबा देसाई भाजपमध्ये सक्रिय नाहीत. माजी आमदार सुरेश हाळवणकर हेही नाराज असल्याचे सांगण्यात आले. मंत्री पाटील यांनी महानगरची नावे आपण निश्चित केली परंतु ग्रामीण नावे निश्चित करताना खासदार धनंजय महाडिक आणि समरजित घाटगे यांना झुकते माप दिले आहे हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत आजऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेली वात आणखी काही तालुक्यात पेटणार की विझणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कुंभार यांच्याऐवजी चराटी उपाध्यक्षआजऱ्यातील प्रकार समजल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बदल करत सुधीर कुंभार यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड रद्द करून त्याजागी अशोक चराटी यांची नियुक्ती केली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा न करता थेट पक्षाचेच काम थांबवण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने आता त्यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना