शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

तेरवाडमध्ये पंचगंगा पात्राला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच नियोजन करून नदीपात्राला जलपर्णीमुक्त करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधा-याला तुंबलेली जलपर्णी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील यांनी रविवारी दुपारी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या लोकांच्या मदतीने बंधा-याचे बरगे काढून पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी हटविली. मात्र जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलल्याने शिरोळ अथवा कृष्णा नदीवरील राजापूर बंधा-यावर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे जलपर्णी जेसीबीच्या साहाय्याने पात्राबाहेर काढण्यात यावी, अशी मागणी नदी प्रदूषणविरोधी चळवळीचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केले आहे. पंचगंगा नदी पाणी प्रदूषणाबरोबर जलपर्णीचे संकट प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात तीव्रतेने जाणवते. गतवर्षी उन्हाळ्यात कोरोना संसर्गामुळे औद्योगिक कारखाने बंद असल्याने नदी ब-याच अंशी प्रदूषणमुक्त झाली होती. परिणामी स्वच्छ पाण्यामुळे जलपर्णीही निर्माण झाली नव्हती.

गेल्या दोन महिन्यापासून औद्योगिक कारखाने पूर्ववत सुरू झाल्याने औद्योगिक कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषण पुन्हा गंभीर बनली आहे.

प्रदूषित पाण्यावर हिवाळ्यात जलपर्णी उगवते. उन्हाळ्यात उग्ररूप धारण करून नदीपात्रात सुमारे तीन ते चार फूट जाडीचा थर घट्ट विणल्यामुळे पाण्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने जलचर प्राण्याबरोबर पाणी स्वच्छ करणारे मासेही मृत्युमुखी पडतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषण करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने काही अंशी पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असले तरी अद्याप बाल्यावस्थेत असलेली जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी पंचगंगाकाठच्या नागरिकांतून होत आहे.

फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) पंचगंगा नदीवरील तेरवाड (ता. शिरोळ) बंधारा परिसरात नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. ०२) पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या सहकार्याने पात्रातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर ढकलण्यात येत आहे.