शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टोल कायमचा रद्द करावा

By admin | Updated: August 27, 2015 00:52 IST

कृती समितीचे ठिय्या आंदोलन : लवकर निर्णय घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाची रक्कम निश्चित करून ती देण्याचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला दिली. दरम्यान, टोलवसुली सुरू होऊ नये आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन टोल कायमचा रद्द करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने बुधवारी सकाळी तासभर ठिय्या आंदोलन केले. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाकरिता नेमलेल्या समितीच्या मूल्यांकनावर पंधरा दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ११ आॅगस्ट रोजी दिले होते; तसेच तोपर्यंत टोलवसुली स्थगित ठेवावी, असे आवाहनही ‘आयआरबी’ला केले होते. ही मुदत बुधवारी संपल्यामुळे टोलवसुली पुन्हा सुरू होईल, या भीतीने सर्वपक्षीय कृती समितीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता शिरोली जकात नाक्याजवळ जमले होते. पालकमंत्र्यांचे आश्वासन जोपर्यंत टोलचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू देणार नाही. तशी सूचना संबंधितांना दिली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपणाशी फोनवर बोलताना दिली असल्याचे निवास साळोखे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तोडगा काढण्यास कितीही अवधी लागला तरी टोलवसुली सुरू होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे साळोखे म्हणाले. लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही साळोखे यांनी व्यक्त केली. जर लवकर तोडगा निघाला नाही आणि टोलवसुली पुन्हा सुरू झाली तर मात्र पुन्हा नव्याने संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा साळोखे यांनी दिला. महापालिकेवर भुर्दंड नको राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे यांची आपण नुकतीच भेट घेतली असून, मूल्यांकनातील एक रुपयाचा बोजाही महापालिकेवर न टाकता सर्व रक्कम राज्य सरकारने भागवावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली. जर ‘आयआरबी’ने ५५० कोटींची किंमत मागितली असली तर ती आम्ही मान्य करणार नाही, सरकारने नेमलेल्या समितीचे मूल्यांकन आणि त्यावर होणारे व्याज द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पुन्हा फसगत होऊ नये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर चालढकल करून पुन्हा जनतेची फसवणूक होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. मागील सरकारच्या काळात आम्ही नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली; पण निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही टोल रद्द झाला नाही. त्यामुळे आताच्या सरकारने तातडीने निर्णय घेऊन टोल रद्द करावा, अशी मागणी लाटकर यांनी केली. यावेळी महापौर वैशाली डकरे, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, महेश जाधव, नामदेव गावडे, भगवान काटे, अशोक पोवार, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुभाष जाधव, रामभाऊ चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, विजय कुलकर्णी, लालासाहेब गायकवाड, समीर नदाफ, बंकट थोडगे, बाबासाहेब भुयेकर, हंबीरराब मुळीक, वसंत मुळीक, श्रीकांत भोसले, आदींनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)‘आयआरबी’चा बोका, दिसेल तिथे ठोका!कार्यकर्त्यांनी सुरुवातीस घोषणाबाजी केली, ‘आयआरबीचा बोका, दिसेल तिथे ठोका’यासह टोल आम्ही देणार नाही, या ‘आयआरबीचं करायचं काय; खाली डोकं, वर पाय’ अशा घोषणांनी परिसर पुन्हा एकदा दणाणून गेला. दिलीप देसाई हे राज्य सरकारविरोधात घोषणा द्यायला लागल्यानंतर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, आदींनी त्यांना रोखले. आपले आंदोलन हे सरकारविरोधात नाही, तर ‘आयआरबी’विरोधात असून, ज्या काही घोषणा द्यायच्या त्या कंपनीच्या विरोधात द्या, अशी सूचना साळोखे यांनी केली.