शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

टोल कायमचा रद्द करावा

By admin | Updated: August 27, 2015 00:52 IST

कृती समितीचे ठिय्या आंदोलन : लवकर निर्णय घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाची रक्कम निश्चित करून ती देण्याचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला दिली. दरम्यान, टोलवसुली सुरू होऊ नये आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन टोल कायमचा रद्द करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने बुधवारी सकाळी तासभर ठिय्या आंदोलन केले. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाकरिता नेमलेल्या समितीच्या मूल्यांकनावर पंधरा दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ११ आॅगस्ट रोजी दिले होते; तसेच तोपर्यंत टोलवसुली स्थगित ठेवावी, असे आवाहनही ‘आयआरबी’ला केले होते. ही मुदत बुधवारी संपल्यामुळे टोलवसुली पुन्हा सुरू होईल, या भीतीने सर्वपक्षीय कृती समितीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता शिरोली जकात नाक्याजवळ जमले होते. पालकमंत्र्यांचे आश्वासन जोपर्यंत टोलचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू देणार नाही. तशी सूचना संबंधितांना दिली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपणाशी फोनवर बोलताना दिली असल्याचे निवास साळोखे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तोडगा काढण्यास कितीही अवधी लागला तरी टोलवसुली सुरू होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे साळोखे म्हणाले. लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही साळोखे यांनी व्यक्त केली. जर लवकर तोडगा निघाला नाही आणि टोलवसुली पुन्हा सुरू झाली तर मात्र पुन्हा नव्याने संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा साळोखे यांनी दिला. महापालिकेवर भुर्दंड नको राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे यांची आपण नुकतीच भेट घेतली असून, मूल्यांकनातील एक रुपयाचा बोजाही महापालिकेवर न टाकता सर्व रक्कम राज्य सरकारने भागवावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली. जर ‘आयआरबी’ने ५५० कोटींची किंमत मागितली असली तर ती आम्ही मान्य करणार नाही, सरकारने नेमलेल्या समितीचे मूल्यांकन आणि त्यावर होणारे व्याज द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पुन्हा फसगत होऊ नये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर चालढकल करून पुन्हा जनतेची फसवणूक होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. मागील सरकारच्या काळात आम्ही नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली; पण निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही टोल रद्द झाला नाही. त्यामुळे आताच्या सरकारने तातडीने निर्णय घेऊन टोल रद्द करावा, अशी मागणी लाटकर यांनी केली. यावेळी महापौर वैशाली डकरे, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, महेश जाधव, नामदेव गावडे, भगवान काटे, अशोक पोवार, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुभाष जाधव, रामभाऊ चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, विजय कुलकर्णी, लालासाहेब गायकवाड, समीर नदाफ, बंकट थोडगे, बाबासाहेब भुयेकर, हंबीरराब मुळीक, वसंत मुळीक, श्रीकांत भोसले, आदींनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)‘आयआरबी’चा बोका, दिसेल तिथे ठोका!कार्यकर्त्यांनी सुरुवातीस घोषणाबाजी केली, ‘आयआरबीचा बोका, दिसेल तिथे ठोका’यासह टोल आम्ही देणार नाही, या ‘आयआरबीचं करायचं काय; खाली डोकं, वर पाय’ अशा घोषणांनी परिसर पुन्हा एकदा दणाणून गेला. दिलीप देसाई हे राज्य सरकारविरोधात घोषणा द्यायला लागल्यानंतर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, आदींनी त्यांना रोखले. आपले आंदोलन हे सरकारविरोधात नाही, तर ‘आयआरबी’विरोधात असून, ज्या काही घोषणा द्यायच्या त्या कंपनीच्या विरोधात द्या, अशी सूचना साळोखे यांनी केली.