शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली मराठा वसतिगृहाचा प्रश्न : संस्थांकडून अर्जांची मागणी; विद्यार्थ्यांना सुविधांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:23 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे.

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया दि. २४ जुलैपासून सुरू झाली आहे. .

विचारेमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी दि. २६ जून रोजी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाईल. दि. २६ जुलैपर्यंत या वसतिगृहामध्ये मुले प्रत्यक्षपणे राहण्यास येतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली.

आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्णांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, स्वयंसेवी संस्था नियुक्ती करण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळण्यास विलंब झाला; त्यामुळे संस्थांकडून अर्र्ज मागविण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीपाठोपाठ आता वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नोंदणीकृत संस्थांना सोमवारपर्यंत मुदतकोल्हापुरातील विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिवपदी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांची नियुक्ती शासनाने केली आहे. संबंधित वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदस्य सचिवांकडे नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. ३०) पर्यंत आहे. दरम्यान, किती संस्थांचे अर्ज दाखल झाले, वसतिगृहाची सुरुवात कधीपासून होणार, याची माहिती जाणून घेण्यासाठी सदस्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. 

राज्य सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत अशा योजना जाहीर केल्या; पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित योजना फसव्या ठरत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह योग्य पद्धतीने आणि किमान १० आॅगस्टपर्यंत तरी सुरू करावे.- ऋतुराज माने, विद्यार्थी नेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर