शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

Maharashtra Assembly Election 2019 ‘स्वाभिमानी’ची दहा वर्षांनी विधानसभेत पुन्हा एंट्री-शिरोळ या बालेकिल्ल्यात ‘स्वाभिमानी’चा पुन्हा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:34 IST

Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत.

ठळक मुद्देसन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मोरसी या मतदारसंघातील देवेंद्र भुयार या शेतकरी कार्यकर्त्याने कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून तब्बल नऊ हजार मताधिक्याने विजय मिळविला. भुयार यांच्या रूपाने ‘स्वाभिमानी’ने २००४ नंतर पुन्हा एकदा विधानसभेत एंट्री केली आहे; पण शिरोळ या बालेकिल्ल्यात मात्र ‘स्वाभिमानी’ला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सन २००४ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिरोळमधून विधानसभा निवडणूक लढविली. १८ हजार ७४७ मताधिक्याने शेट्टी यांनी काँग्रेसच्या रजनी मगदूम यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केली होती. त्यानंतर मात्र २००९, २०१४ आणि आता २०१९ मध्ये शिरोळची निवडणूक त्यांनी ताकदीने लढविली; पण त्यांना यश आले नाही. २००९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना काँग्रेसचे सा. रे. पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये ‘स्वाभिमानी’ने सावकार मादनाईक यांना उमेदवारी दिल्याने उल्हास पाटील यांनी बंडखोरी करीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. सावकार मादनाईक चौथ्या स्थानी राहिले.

सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या. शिरोळमधून पुन्हा एकदा ‘स्वाभिमानी’ने सावकर मादनाईक यांनाच रिंगणात उतरविले होते. मिरजेमधून बाळासाहेब वनमोरे, अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार, नंदूरबारमधून प्रकाश आंकुरडे, अकोला जिल्ह्यातील बालापूरमधून तुकाराम दुधे यांना रिंगणात उतरविले होते; पण यापैकी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी ‘स्वाभिमानी’च्या पदरी निराशा आली. भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर