शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 ‘स्वाभिमानी’ची दहा वर्षांनी विधानसभेत पुन्हा एंट्री-शिरोळ या बालेकिल्ल्यात ‘स्वाभिमानी’चा पुन्हा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:34 IST

Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत.

ठळक मुद्देसन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मोरसी या मतदारसंघातील देवेंद्र भुयार या शेतकरी कार्यकर्त्याने कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून तब्बल नऊ हजार मताधिक्याने विजय मिळविला. भुयार यांच्या रूपाने ‘स्वाभिमानी’ने २००४ नंतर पुन्हा एकदा विधानसभेत एंट्री केली आहे; पण शिरोळ या बालेकिल्ल्यात मात्र ‘स्वाभिमानी’ला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सन २००४ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिरोळमधून विधानसभा निवडणूक लढविली. १८ हजार ७४७ मताधिक्याने शेट्टी यांनी काँग्रेसच्या रजनी मगदूम यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केली होती. त्यानंतर मात्र २००९, २०१४ आणि आता २०१९ मध्ये शिरोळची निवडणूक त्यांनी ताकदीने लढविली; पण त्यांना यश आले नाही. २००९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना काँग्रेसचे सा. रे. पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये ‘स्वाभिमानी’ने सावकार मादनाईक यांना उमेदवारी दिल्याने उल्हास पाटील यांनी बंडखोरी करीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. सावकार मादनाईक चौथ्या स्थानी राहिले.

सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या. शिरोळमधून पुन्हा एकदा ‘स्वाभिमानी’ने सावकर मादनाईक यांनाच रिंगणात उतरविले होते. मिरजेमधून बाळासाहेब वनमोरे, अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार, नंदूरबारमधून प्रकाश आंकुरडे, अकोला जिल्ह्यातील बालापूरमधून तुकाराम दुधे यांना रिंगणात उतरविले होते; पण यापैकी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी ‘स्वाभिमानी’च्या पदरी निराशा आली. भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर