शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
4
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
5
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
6
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
7
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
8
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
9
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
11
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
12
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
13
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
14
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
15
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
16
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
17
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
18
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
19
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
20
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Assembly Election 2019 ‘स्वाभिमानी’ची दहा वर्षांनी विधानसभेत पुन्हा एंट्री-शिरोळ या बालेकिल्ल्यात ‘स्वाभिमानी’चा पुन्हा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:34 IST

Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत.

ठळक मुद्देसन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मोरसी या मतदारसंघातील देवेंद्र भुयार या शेतकरी कार्यकर्त्याने कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून तब्बल नऊ हजार मताधिक्याने विजय मिळविला. भुयार यांच्या रूपाने ‘स्वाभिमानी’ने २००४ नंतर पुन्हा एकदा विधानसभेत एंट्री केली आहे; पण शिरोळ या बालेकिल्ल्यात मात्र ‘स्वाभिमानी’ला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सन २००४ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिरोळमधून विधानसभा निवडणूक लढविली. १८ हजार ७४७ मताधिक्याने शेट्टी यांनी काँग्रेसच्या रजनी मगदूम यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केली होती. त्यानंतर मात्र २००९, २०१४ आणि आता २०१९ मध्ये शिरोळची निवडणूक त्यांनी ताकदीने लढविली; पण त्यांना यश आले नाही. २००९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना काँग्रेसचे सा. रे. पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये ‘स्वाभिमानी’ने सावकार मादनाईक यांना उमेदवारी दिल्याने उल्हास पाटील यांनी बंडखोरी करीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. सावकार मादनाईक चौथ्या स्थानी राहिले.

सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या. शिरोळमधून पुन्हा एकदा ‘स्वाभिमानी’ने सावकर मादनाईक यांनाच रिंगणात उतरविले होते. मिरजेमधून बाळासाहेब वनमोरे, अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार, नंदूरबारमधून प्रकाश आंकुरडे, अकोला जिल्ह्यातील बालापूरमधून तुकाराम दुधे यांना रिंगणात उतरविले होते; पण यापैकी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी ‘स्वाभिमानी’च्या पदरी निराशा आली. भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर