शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पानसरे हत्याप्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती; पुढील सुनावणी २३ जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:23 IST

खटल्याच्या सुनावणीला गती

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी कोल्हापुरात जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी दहा संशयितांवर दोषनिश्चिती करण्यात आली. यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.

पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. संशयितांवर दोषनिश्चिती झाल्यामुळे खटल्याच्या कामकाजाला गती येईल, असा विश्वासही ॲड. राणे यांनी व्यक्त केला. अटकेतील दहा संशयितांपैकी सहा संशयित बंगळुरू येथील कारागृहात होते, तर तीन संशयित पुण्यातील येरवडा कारागृहात होते. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.

दहा संशयित हजर

समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

१२ संशयितांवर दाखल होता गुन्हा

गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर एसआयटीने तपास करून १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, एटीएसकडूनही तपास सुरू आहे. न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपांबद्दल विचारणा केली. मात्र, सर्व संशयितांनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. 

दहा संशयित हजर

समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

आरोप नाकबूल

न्यायाधीशांनी आरोपांबद्दल विचारणा करताच सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केला. सुनावणीच्या सुरुवातीला संशयितांचे वकील समीर पटवर्धन उपस्थित नव्हते. त्यामुळे काही संशयितांनी वकिलांशी चर्चा करून दोषनिश्चितीच्या कागदांवर सही करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. २० मिनिटांनी ॲड. पटवर्धन आल्यानंतर त्यांच्याशी संशयितांची चर्चा झाली. त्यानंतर संशयितांनी दोषनिश्चितीच्या कागदावर सह्या केल्या. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर