शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

‘विवेकानंद’तर्फे शिक्षक आपल्या दारी.... अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:27 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने वाघवे (ता. पन्हाळा ) येथील विद्यार्थिनींच्या घरी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

महाविद्यालयात अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागांतील आहेत. विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर किंवा नोकरदार आहेत. त्यांना महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळावी, त्यांच्या अडचणींची उकल व्हावी, महाविद्यालयाच्या विविध पाठ्यक्रमांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड, कल, त्यांची शैक्षणिक प्रगती यांसह त्यांच्या वर्गातील उपस्थितीची माहिती पालकांना घरबसल्या मिळत असल्याने या उपक्रमाबाबत पालकवर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ होत आहे. त्यासोबतच शिक्षक व विद्यार्थ्यांतील जिव्हाळा वाढण्यास मदत होत आहे, असे डॉ. दीपक तुपे यांनी सांगितले.प्राध्यापकांचे गट‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात पाच ते सहा प्राध्यापकांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. ३१ गावांमध्ये हे गट कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षक रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत महाविद्यालयातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, करिअर दिशा निश्चित केली जाणार आहे. यासह त्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

आज शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालक जर महाविद्यालयात येत नसतील तर प्राध्यापकांनी पालकांच्या दारात जाऊन त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयीची माहिती देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर 

टॅग्स :Schoolशाळा