शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘विवेकानंद’तर्फे शिक्षक आपल्या दारी.... अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:27 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने वाघवे (ता. पन्हाळा ) येथील विद्यार्थिनींच्या घरी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

महाविद्यालयात अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागांतील आहेत. विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर किंवा नोकरदार आहेत. त्यांना महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळावी, त्यांच्या अडचणींची उकल व्हावी, महाविद्यालयाच्या विविध पाठ्यक्रमांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड, कल, त्यांची शैक्षणिक प्रगती यांसह त्यांच्या वर्गातील उपस्थितीची माहिती पालकांना घरबसल्या मिळत असल्याने या उपक्रमाबाबत पालकवर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ होत आहे. त्यासोबतच शिक्षक व विद्यार्थ्यांतील जिव्हाळा वाढण्यास मदत होत आहे, असे डॉ. दीपक तुपे यांनी सांगितले.प्राध्यापकांचे गट‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात पाच ते सहा प्राध्यापकांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. ३१ गावांमध्ये हे गट कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षक रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत महाविद्यालयातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, करिअर दिशा निश्चित केली जाणार आहे. यासह त्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

आज शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालक जर महाविद्यालयात येत नसतील तर प्राध्यापकांनी पालकांच्या दारात जाऊन त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयीची माहिती देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर 

टॅग्स :Schoolशाळा