शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘विवेकानंद’तर्फे शिक्षक आपल्या दारी.... अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:27 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने वाघवे (ता. पन्हाळा ) येथील विद्यार्थिनींच्या घरी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

महाविद्यालयात अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागांतील आहेत. विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर किंवा नोकरदार आहेत. त्यांना महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळावी, त्यांच्या अडचणींची उकल व्हावी, महाविद्यालयाच्या विविध पाठ्यक्रमांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड, कल, त्यांची शैक्षणिक प्रगती यांसह त्यांच्या वर्गातील उपस्थितीची माहिती पालकांना घरबसल्या मिळत असल्याने या उपक्रमाबाबत पालकवर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ होत आहे. त्यासोबतच शिक्षक व विद्यार्थ्यांतील जिव्हाळा वाढण्यास मदत होत आहे, असे डॉ. दीपक तुपे यांनी सांगितले.प्राध्यापकांचे गट‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात पाच ते सहा प्राध्यापकांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. ३१ गावांमध्ये हे गट कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षक रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत महाविद्यालयातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, करिअर दिशा निश्चित केली जाणार आहे. यासह त्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

आज शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालक जर महाविद्यालयात येत नसतील तर प्राध्यापकांनी पालकांच्या दारात जाऊन त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयीची माहिती देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर 

टॅग्स :Schoolशाळा