शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील जनतेवर कराचा बोजा पडू देणार नाही

By admin | Updated: August 15, 2015 00:42 IST

दीपक केसरकर यांची माहिती : चंदगडच्या पर्यटनाला निधी देण्याची ग्वाही; चंदगड पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

चंदगड : शहराजवळच्या गावासाठी आकारण्यात येणारी घरपट्टी ही शहरात आकारली जाते तेवढीच आकारली जात होती. याचा भुर्दंड ग्रामीण भागातील नागरिकांना बसत होता. मात्र, राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. यासाठी नागरिकांकडून हरकती मागविण्यात येत आहे. या हरकतीवर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊन अधिकारांचा बोजा नागरिकांवर पडू देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.चंदगड पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सभापती ज्योती पवार पाटील यांनी स्वागत करून तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली.केसरकर म्हणाले, चंदगडच्या पर्यटन व्यवसायाच्यादृष्टीने वाव आहे. त्यासाठी जंगल परिसरातील गावामध्ये वनहक्क समित्या स्थापन करून पर्यटनाचा कार्यक्रम पारगड परिसरात सुरू करा. चौकूळ, आंबोली, मोर्लेकडून पारगडकडे येणारे रस्ते जोडून लवकरच वाहतूक सुरु होईल. मोर्ले रस्त्याला ५ कोटी व चंदगड-इसापूर-पारगड रस्त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.महाराष्ट्रातील ८० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे. इस्राईलमध्ये शेतीबाबत जे प्रयोग करण्यात आले त्याचा अभ्यास करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी शासन कार्यक्रम राबवणार आहे. काजू बोंडापासून ज्यूस तयार करून ते कोठे वापरता येईल, यासंबंधी संशोधनाला चालना देणार आहे. प्रत्येक गावाला जोडण्यात येणारा मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करणार असल्याचे सांगितले.यावेळी जि. प. महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती दीपक पाटील यांनी शासनाने १४व्या वित्त आयोगाची निधी थेट ग्रामपंचायतींना दिल्याने पं. स. व जि. प.चे काय काम उरले नाही. या योजनेतील निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा असल्याने जि. प. व पं. स. सदस्यांना विकासासाठी निधी मिळत नसल्याने सदस्यांविरोधात लोकांच्या तक्रारी वाढणार आहेत. त्यामुळे या निधीबाबत शासनाने फेरविचार करावा.‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांनी सहकार तत्त्वावर सुरू करण्यात आलेला दौलत कारखाना सहकारातच राहावा यासाठी शासनाने दौलतच्या लिलावास स्थगिती द्यावी, अशी मागणी करून एव्हीएच प्रकल्प तालुक्यातून कायमचा हद्दपार करण्याची मागणी केली.माजी सभापती संग्राम पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी करून चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचे पालकत्व केसरकर यांनी घ्यावे व भागाचा कायापालट करावा, अशी विनंती केली.यावेळी प्रा. एन. एस. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी प्रत्येक विभागाची माहिती सादर केली.यावेळी नागरिकांनी एव्हीएच, दौलतबाबत तसेच हत्ती, गवा आदी जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत व इतर कामांचे निवेदन केसरकर यांच्याकडे दिले.जि. प. सदस्य राजेंद्र परीट, अनुराधा पाटील, कल्लाप्पा नाईक, प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, विद्याधर बागे, रघुवीर शेलार, बाळासाहेब कुपेकर, अनिल सुरूतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुल्ले, प्रकल्प अधिकारी जगताप, व्ही. एस. घाटगे, ए. डी. कोष्टी, सी. जी. गुजर, एस. व्ही. सावळगी आदींसह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.संजय चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले. कक्ष अधिकारी व्ही. जी. नरवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)