शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

‘तौउते’मुळे जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही बसली आहे. या वादळी पावसाने जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरवरील केळी, आंबा, पपई पिकांना मोठा फटका बसला. पाच तालुक्यांतील १८ गावांतील ४५ शेतकऱ्यांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक असे, ४ लाखांचे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार नुकसान शासनाला कळवले असून मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ‘तौउते’ चक्रीवादळ तयार झाले. या वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्याच, त्याशिवाय घरांचेही मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही १६ व १७ मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की ऊस, मका या पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला. आडसाल ऊस व मका आडवे झाले आहेत. भाजीपाल्याचेही नुकसान झाले त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उखडून पडली.

राज्य शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये शासनाकडून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळते. त्यानुसार या वादळाने २४.४२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्याला वादळाचा मोठा फटका बसला. या तालुक्यातील ३.५० हेक्टरवरील केळी, ०.६५ हेक्टरवरील पपई व १३.५० हेक्टरवरील आंबा असे १४.१५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील पपई बागांनाही फटका बसला आहे. नुकसानीची माहिती कृषी विभागाने राज्य शासनाकडे कळवली आहे, आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गारपिटीनंतर दुसरा दणका

‘तौउते’ चक्रीवादळापूर्वी आठ-दहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात गारपीट झाली होती. यामध्ये भाजीपाल्याला फटका बसला होता. त्यानंतर ‘तौउते’च्या रूपाने दुसरे संकट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

तालुकानिहाय असे झाले नुकसान हेक्टरमध्ये -

तालुका गावांची संख्या कारले केळी पपई आंबा एकूण क्षेत्र नुकसान रुपयात

करवीर ५ ० १.५० ० ० १.५० २०,२५०

राधानगरी ५ ० ०.४४ ० ० ०.४४ ५,९४०

पन्हाळा १ ०.८३ ० ० ० ०.८३ ११,२०६

शाहूवाडी ६ ० ३.५० ०.६५ १३.५० १७.६५ ३,०१,९५०

शिरोळ १ ० ० ० ४.०० ४.०० ७२,०००

एकूण १८ ०.८३ ५.४४ ०.६५ १७.५० २४.४२ ४,११,३४६