शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

सद्विचारांची साथ धरा-- तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

By admin | Updated: November 28, 2014 23:57 IST

गोविंद काळे : सुखसोयी असल्या तरी माणसं हरवल्याची खंत

कोल्हापूर : आज सगळ्या सुखसोयी आहेत. मोठी घरे, स्वतंत्र बेडरूम्स आहेत; पण माणसेच हरवली आहेत. एकमेकांत संवाद नाही, दु:ख व्यक्त करता येत नाही, आनंद ओरडून सांगता येत नाही. शक्ती-संपत्तीमागे धावताना आयुष्यातले सत्त्व आणि सत्य समजायचेच राहून जाते. आपल्या आयुष्यात शांतीचा झरा अखंड वाहायचा असेल, तर आपल्या मंत्रांनी, ग्रंथांनी, संतवाणीतून उमटलेल्या सद्विचारांच्या शब्दरत्नांची कास धरा, असे प्रतिपादन गोविंद काळे यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सांगलीकर व करवीर मंगलधामचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी जयंत तेंडुलकर, हरिश्चंद्र अष्टेकर, श्रीकांत लिमये उपस्थित होते. उद्घाटनानंतर गोव्याचे गोविंद काळे यांनी ‘तुम्ही तरोनी विश्व तारा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत ऋग्वेदापासून आजतागायत सद्विचारांची परंपरा चालत आली आहे. ‘सर्वे संतु निरामया’ या मंत्रातून सर्वांच्या हिताची कामना केली आहे. तुकाराम महाराजांनी ‘शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे; पण आपण भौतिक सुखाच्या मागे धावतो. आयुष्य संपत आले तरी आपण काय मिळवले, ते समजत नाही. एका क्षणी क्षणभंगूर जीवनाचे शाश्वत समजते. तोपर्यंत हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, अशी अवस्था होते.त्यामुळे देवासमोर जेव्हा हात जोडाल, तेव्हा एकच मागणे मागा, मला सूर्यासारखे तेज दे, ओज दे, स्वत:सोबत दुसऱ्याचेही आयुष्य अधिक प्रकाशमान करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’, या भावनेने नव्हे, तर तो तरुन गेला पाहिजे आणि आपल्यानंतर संकटात सापडेल्या व्यक्तींनाही त्याला तारून नेता आले पाहिजे. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कासार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)