शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सद्विचारांची साथ धरा-- तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

By admin | Updated: November 28, 2014 23:57 IST

गोविंद काळे : सुखसोयी असल्या तरी माणसं हरवल्याची खंत

कोल्हापूर : आज सगळ्या सुखसोयी आहेत. मोठी घरे, स्वतंत्र बेडरूम्स आहेत; पण माणसेच हरवली आहेत. एकमेकांत संवाद नाही, दु:ख व्यक्त करता येत नाही, आनंद ओरडून सांगता येत नाही. शक्ती-संपत्तीमागे धावताना आयुष्यातले सत्त्व आणि सत्य समजायचेच राहून जाते. आपल्या आयुष्यात शांतीचा झरा अखंड वाहायचा असेल, तर आपल्या मंत्रांनी, ग्रंथांनी, संतवाणीतून उमटलेल्या सद्विचारांच्या शब्दरत्नांची कास धरा, असे प्रतिपादन गोविंद काळे यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सांगलीकर व करवीर मंगलधामचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी जयंत तेंडुलकर, हरिश्चंद्र अष्टेकर, श्रीकांत लिमये उपस्थित होते. उद्घाटनानंतर गोव्याचे गोविंद काळे यांनी ‘तुम्ही तरोनी विश्व तारा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत ऋग्वेदापासून आजतागायत सद्विचारांची परंपरा चालत आली आहे. ‘सर्वे संतु निरामया’ या मंत्रातून सर्वांच्या हिताची कामना केली आहे. तुकाराम महाराजांनी ‘शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे; पण आपण भौतिक सुखाच्या मागे धावतो. आयुष्य संपत आले तरी आपण काय मिळवले, ते समजत नाही. एका क्षणी क्षणभंगूर जीवनाचे शाश्वत समजते. तोपर्यंत हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, अशी अवस्था होते.त्यामुळे देवासमोर जेव्हा हात जोडाल, तेव्हा एकच मागणे मागा, मला सूर्यासारखे तेज दे, ओज दे, स्वत:सोबत दुसऱ्याचेही आयुष्य अधिक प्रकाशमान करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’, या भावनेने नव्हे, तर तो तरुन गेला पाहिजे आणि आपल्यानंतर संकटात सापडेल्या व्यक्तींनाही त्याला तारून नेता आले पाहिजे. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कासार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)