शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सद्विचारांची साथ धरा-- तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

By admin | Updated: November 28, 2014 23:57 IST

गोविंद काळे : सुखसोयी असल्या तरी माणसं हरवल्याची खंत

कोल्हापूर : आज सगळ्या सुखसोयी आहेत. मोठी घरे, स्वतंत्र बेडरूम्स आहेत; पण माणसेच हरवली आहेत. एकमेकांत संवाद नाही, दु:ख व्यक्त करता येत नाही, आनंद ओरडून सांगता येत नाही. शक्ती-संपत्तीमागे धावताना आयुष्यातले सत्त्व आणि सत्य समजायचेच राहून जाते. आपल्या आयुष्यात शांतीचा झरा अखंड वाहायचा असेल, तर आपल्या मंत्रांनी, ग्रंथांनी, संतवाणीतून उमटलेल्या सद्विचारांच्या शब्दरत्नांची कास धरा, असे प्रतिपादन गोविंद काळे यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सांगलीकर व करवीर मंगलधामचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी जयंत तेंडुलकर, हरिश्चंद्र अष्टेकर, श्रीकांत लिमये उपस्थित होते. उद्घाटनानंतर गोव्याचे गोविंद काळे यांनी ‘तुम्ही तरोनी विश्व तारा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत ऋग्वेदापासून आजतागायत सद्विचारांची परंपरा चालत आली आहे. ‘सर्वे संतु निरामया’ या मंत्रातून सर्वांच्या हिताची कामना केली आहे. तुकाराम महाराजांनी ‘शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे; पण आपण भौतिक सुखाच्या मागे धावतो. आयुष्य संपत आले तरी आपण काय मिळवले, ते समजत नाही. एका क्षणी क्षणभंगूर जीवनाचे शाश्वत समजते. तोपर्यंत हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, अशी अवस्था होते.त्यामुळे देवासमोर जेव्हा हात जोडाल, तेव्हा एकच मागणे मागा, मला सूर्यासारखे तेज दे, ओज दे, स्वत:सोबत दुसऱ्याचेही आयुष्य अधिक प्रकाशमान करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’, या भावनेने नव्हे, तर तो तरुन गेला पाहिजे आणि आपल्यानंतर संकटात सापडेल्या व्यक्तींनाही त्याला तारून नेता आले पाहिजे. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कासार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)