शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

‘ताराराणी’ला सर्वाधिक ३३% जनाधार

By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST

मतदारांनी दाखवला विश्वास : तिन्ही पक्षांची टीका गनिमी काव्याने परतावत मिळविले यश

राजाराम लोंढे - कोल्हापूर -महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जनाधार होण्याचा मान ताराराणी आघाडीला मिळालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा तिन्ही बाजूने होणारा हल्ला त्याच ताकदीने परतवून लावला. त्यांच्या ३९ उमेदवारांना ३३ टक्के मते मिळाली असून मतदारांनी ‘कोल्हापूरकरांसह महाडिकही शहाणे’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी ताकदीने उतरले होते. महापालिका झेंडा फडकावयाचाच या इर्षेने सर्वच पक्षांनी ‘साम, दाम, दंड’ या नीतीचा वापर केला. सर्वच पक्षांनी टीका-टिप्पणी केली पण खऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-ताराराणी आघाडीत झडल्या. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. महाडिक कुटुंबीयांच्या राजकारणाचे थेट ऐतिहासिक दसरा चौकातून वाभाडे काढले. ‘एकाच घरात काँग्रेसचा आमदार, मुलगा भाजपचा आमदार आणि पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार, हे पाहिल्यानंतर ‘कोल्हापूरची जनता मूर्ख की महाडिक शहाणे’ अशी जहाल टीका आमदार मुश्रीफ यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अखंड प्रचारात मुश्रीफ यांनी महाडिक व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाच टार्गेट करून आपला आगामी राजकारणातील इरादा स्पष्ट केला होता. केवळ आमदार मुश्रीफ यांनीच टीका केली नाही तर, राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील (माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोडून) नेत्यांनी ‘ताराराणी’ आघाडीवर टीकेची झोड उठविली होती. मतदानाची तारीख जशी जवळ येत होती, तशी आमदार मुश्रीफ यांच्या ‘मूर्ख व शहाणे’ या टीकेची चर्चा जोर धरत होती. या टीकेच्या माध्यमातून महाडिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा करून त्यांचा जनाधार कमी होईल, या हेतूनेच त्यांच्यावर हल्ला चढविला जात होता. आमदार मुश्रीफ यांच्या व्यक्तिगत टीकेनंतर आमदार महादेवराव महाडिक कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली. आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते म्हटल्यावर त्यांनी सर्व ताकद पणाला लावून ‘गनिमी काव्याने’ विरोधकांचा हल्ला परतवून लावला. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ताराराणी आघाडीला तिन्ही बाजूने घेरले होते. ‘ताराराणी’ हा हल्ला कसा परतवून लावते, याविषयी उत्सुकता होती; पण आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावत आपण राजकारणात कच्चे नाही, हे दाखवून दिले. ‘भाजप-ताराराणी’ला सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी त्यांनी घेतलेली मते निश्चितच महत्त्वाची आहेत. ताराराणी आघाडीने ३९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांनी १ लाख ५१ हजार ६७६ या झालेल्या मतांपैकी तब्बल ५१ हजार २१९ (३३ टक्के) मतदान घेऊन आपणच सर्वांत पुढे असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने ८० जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यांनी ३ लाख ७ हजार ३३५ या झालेल्या मतांपैकी ६२ हजार ८३२ मते (२०.३५ टक्के) घेतली. टक्केवारीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ‘ताराराणी’चा एक उमेदवार वगळता ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत. निवडणुकीतील टीका, त्यानंतर झालेले मतदान व निकाल पाहता ‘कोल्हापूरकरांसह महाडिकच शहाणे’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षनिहाय मिळालेली मते अशीपक्षउमेदवारांची संख्यालढलेल्या जागाचे मतदानमिळालेली मतेटक्केवारीताराराणी३९१ लाख ५१ हजार ६७६५१ हजार २१९३३ भाजप४१ (पुरस्कृतसह)१ लाख ४० हजार ४०४५ हजार ४९०३२.४८ काँग्रेस८१३ लाख ११ हजार ९३७७६ हजार ५८४२४.५५राष्ट्रवादी८०३ लाख ७ हजार ३३५६२ हजार ८३२२०.३५शिवसेना८१३ लाख ११ हजार ९३७४४ हजार ३५४१४.२१ ‘ताराराणी आघाडी कडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराला ४०० च्या आत मते आहेत. ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत.