शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मानवाड येथील गुरव कुटुंबाची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील सुनीता हरी गुरव त्यांचे पती हरी गुरव काही वर्षांपूर्वी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील सुनीता हरी गुरव त्यांचे पती हरी गुरव काही वर्षांपूर्वी झाडावरून पडून जखमी झाले होते. त्यामध्ये त्यांच्या पाठीचा मणका आणि दोन्ही पाय निकामी झाल्याने उपचारांसाठी जमीन गहाण ठेवून दहा वर्षे उपचार केला. मात्र, चार मुली आणि एक अपंग मुलगा यांचा सांभाळ करताना सुनीता गुरव यांच्या पतीचा २०११ साली मृत्यू झाला. त्यानंतर चार मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडल्याने आज हे कुटुंब आर्थिक विवंचनेत आपले जीवन जगत आहे.

मुलगा सूरज हा इयत्ता अकरावीमध्ये ज्युनिअर कॉलेज कळे मध्ये शिक्षण घेत आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, तीन मुली लहान असल्याने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एका स्त्रीवर पडल्याने कुटुंबाची वाताहात झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी वारंवार हेलपाटे मारले; मात्र माझी दखल कोणी घेतली नाही. त्यामुळे आम्ही नेमकं जगायचं कसं आणि न्याय मागायचा कुठं? असे सुनीता गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावनिक व्याकूळ होऊन आपली व्यथा मांडली.

चौकट १)

मोलमजुरी करून मी माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करीत आहे; मात्र त्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. त्यामुळे लहान मुलांचा सांभाळ करणे अवघड होऊन बसले आहे. मोलमजुरी करण्यासाठी तीन वर्षे वयाच्या मुलीला शेताच्या बांधावर झोपवून शेतात काम करताना डोळ्यांसमोर आसवे उभी राहत आहेत.

श्रीमती. सुनीता गुरव मानवाड (गुरववाडी)

चौकट २) सूरज गुरव याने मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. मात्र, त्याचे वडील मृत झाल्याने गरीब परिस्थितीपुढे हे कुटुंब हतबल झाले आहे. त्यामुळे सूरजच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तीच्या मदतीची गरज आहे.

फोटो ; मानवाड (ता. पन्हाळा) येथील आर्थिक परिस्थितीसमोर हतबल झालेले गुरव कुटुंब.