शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

ठाकरे बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा; कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांत ऊर्जा, म्हणाले..

By राजाराम लोंढे | Updated: April 21, 2025 13:57 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या बंधूमध्ये ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दोन भाऊ एकत्र यावे, ही महाराष्ट्राची पर्यायाने मराठी माणसाची इच्छा असल्याची भावना पदाधिकारी व्यक्त करत असून तसे झाले तर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत उद्धव ठाकरेराज ठाकरे हे तयार झाले आहेत. अनेक वर्षे दोघांनी एकत्रित काम केले. मात्र, मार्च २००६ मध्ये शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगत राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र केला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. गेली १९ वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पक्ष घेऊन सक्रीय झाले आहेत. एकसंध शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे यांचाही प्रवास सुरू होता. मात्र, २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि पक्षच ताब्यात घेतला.शिवसेनेची ताकद विभागल्याने आगामी मुंबई महापालिकेसह सर्वच ठिकाणी उद्धवसेनेची परीक्षा राहणार आहे. त्यात हिंदीच्या मुद्यावरून दोन्ही भावांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे सुतोवाच केले. महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकत्र येण्याची दोघांनीही तयारी दाखवल्याने दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसे चैतन्य दिसत आहे. दोन्ही भावांमध्ये विभागलेली ताकद एक झाले तर मुंबईसह महाराष्ट्रावर त्यांचे वर्चस्व राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

भाजपला रोखण्याची ताकद ठाकरे बंधूमध्येचमहाराष्ट्रात भाजपचा वारू चौफेर उधळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्यांची तयारी पाहता, मुंबईसह प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा ताब्यात ठेवण्याची व्यूहरचना आहे. त्यामुळे भाजपला रोखायचे झाल्यास ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांतील सामान्य कार्यकर्त्यांची आहे.                   

उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघेही भाऊ ‘मातोश्री’मध्ये वाढले, मोठे झालेत. या दोघांनी एकत्र यावे, ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची इच्छा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काही मंडळींनी गुजरात पुढे गुडघे टेकल्याने महाराष्ट्र अडचणीत आला. त्यातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. - संजय पवार (उपनेते, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना) 

दोघांमध्ये रक्ताचे नाते आहे. काही राजकीय मतभेदामुळे ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागला. आता, एकत्र येण्याची चर्चा सुरू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस सध्या अडचणीत आहे. त्याच्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलेतर मुंबईसह सर्व ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील. - राजू दिंडोर्ले (जिल्हाप्रमुख, मनसे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे