शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाकरे बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा; कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांत ऊर्जा, म्हणाले..

By राजाराम लोंढे | Updated: April 21, 2025 13:57 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या बंधूमध्ये ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दोन भाऊ एकत्र यावे, ही महाराष्ट्राची पर्यायाने मराठी माणसाची इच्छा असल्याची भावना पदाधिकारी व्यक्त करत असून तसे झाले तर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत उद्धव ठाकरेराज ठाकरे हे तयार झाले आहेत. अनेक वर्षे दोघांनी एकत्रित काम केले. मात्र, मार्च २००६ मध्ये शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगत राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र केला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. गेली १९ वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पक्ष घेऊन सक्रीय झाले आहेत. एकसंध शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे यांचाही प्रवास सुरू होता. मात्र, २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि पक्षच ताब्यात घेतला.शिवसेनेची ताकद विभागल्याने आगामी मुंबई महापालिकेसह सर्वच ठिकाणी उद्धवसेनेची परीक्षा राहणार आहे. त्यात हिंदीच्या मुद्यावरून दोन्ही भावांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे सुतोवाच केले. महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकत्र येण्याची दोघांनीही तयारी दाखवल्याने दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसे चैतन्य दिसत आहे. दोन्ही भावांमध्ये विभागलेली ताकद एक झाले तर मुंबईसह महाराष्ट्रावर त्यांचे वर्चस्व राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

भाजपला रोखण्याची ताकद ठाकरे बंधूमध्येचमहाराष्ट्रात भाजपचा वारू चौफेर उधळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्यांची तयारी पाहता, मुंबईसह प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा ताब्यात ठेवण्याची व्यूहरचना आहे. त्यामुळे भाजपला रोखायचे झाल्यास ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांतील सामान्य कार्यकर्त्यांची आहे.                   

उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघेही भाऊ ‘मातोश्री’मध्ये वाढले, मोठे झालेत. या दोघांनी एकत्र यावे, ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची इच्छा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काही मंडळींनी गुजरात पुढे गुडघे टेकल्याने महाराष्ट्र अडचणीत आला. त्यातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. - संजय पवार (उपनेते, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना) 

दोघांमध्ये रक्ताचे नाते आहे. काही राजकीय मतभेदामुळे ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागला. आता, एकत्र येण्याची चर्चा सुरू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस सध्या अडचणीत आहे. त्याच्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलेतर मुंबईसह सर्व ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील. - राजू दिंडोर्ले (जिल्हाप्रमुख, मनसे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे