शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

टेकवाडी-वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळला

By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST

कुंभी नदी : पाण्याअभावी तिसंगी, वेतवडे येथील पिके धोक्यात; पाटबंधारे विभागाचा नाकर्तेपणा

साळवण : टेकवाडी-वेतवडे दरम्यान कुंभी नदीवरील सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने करणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी तिसंगी, वेतवडे येथील पिके धोक्यात आली असून, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती ताबडतोब करावी, अशी मागणी होत आहे.वेतवडे बंधारा हा एकूण अकरा गाळ््यांचा आहे. सहा नंबरच्या गाळ््यामध्ये कित्येक दिवसांपासून एका मोठ्या झाडाचा बुंधा अडकून पडला आहे. संबंधित विभागाने हा बुंधा बाजूला काढणे आवश्यक होते; पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. शेजारचा सात नंबरच्या गाळ््याच्या पिलरचा नदीच्या तळाकडील बाजूचा भाग कोसळला आहे. नदीपात्रात दगड विखरून पडले आहे.अनेक गाळ््यांतून पाणी साठविणाऱ्या प्लेटस् अडकविण्याच्या खाचा खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्या गाळ््यातून प्लेटस् बसविणे अवघड बनले आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही कडेला वरील बाजूस छोटे संरक्षक पिलर्स होते, पण त्यापैकी अनेक पिलर्स निकामी झाले आहेत. पुराच्यावेळी प्रवाशांना बंधाऱ्यावरून जाण्यासाठी हे छोटे पिलर्स दिशा दर्शकाची भूमिका बजावत होते.टेकडीवरील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला यापूर्वी मोठी भेग पडली होती. संबंधित विभागाने या ठिकाणी काही प्रमाणात डागडुजी केली होती, मात्र मजबुतीकरण झाले नाही, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे टेकवाडीकडील बाजूची झीज मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या बाजूला नदीलगत टेकडीवर मानवी वस्ती असल्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागावरसुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. (वार्ताहर)शेतातील पिके होरपळून जाण्याची भीतीबंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे पाणीसाठ्याअभावी शेकडो एकरांतील ऊस, भात, मका, सूर्यफूल पिके उन्हामुळे होरपळून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. उन्हाळी भात रोप लावणी केलेल्या वाफ्यात पाणीसाठा करणे कठीण बनले आहे. पिके कशी वाचवायची ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच वेतवडे, तिसंगी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे कुंभी नदीपलीकडील वेतवडे, बालेवाडी, मणदूर या गावांच्या वाहतुकीबरोबरच शेती, पिण्याचे पाणी यांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. अणदूर बंधारा पिलर कोसळल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. मणदूर पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे, तर आता वेतवडे बंधारा पिलर कोसळल्यामुळे धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि वाहतूक, शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. - मेघाराणी जाधव, जि. प. सदस्याउन्हाळ््यात वातावरण स्वच्छ असते, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक केले आहे. बंधाऱ्यात पाणीसाठाच नसल्यामुळे कोवळी भात रोपे कोमेजू लागली आहेत. सूर्यफूल आणि ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागली आहेत. संबंधित विभागाने बंधाऱ्याची डागडुगी त्वरित करावी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे.- रघुनाथ दगडू शिंदे,शेतकरी वेतवडे