शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

टेकवाडी-वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळला

By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST

कुंभी नदी : पाण्याअभावी तिसंगी, वेतवडे येथील पिके धोक्यात; पाटबंधारे विभागाचा नाकर्तेपणा

साळवण : टेकवाडी-वेतवडे दरम्यान कुंभी नदीवरील सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने करणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी तिसंगी, वेतवडे येथील पिके धोक्यात आली असून, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती ताबडतोब करावी, अशी मागणी होत आहे.वेतवडे बंधारा हा एकूण अकरा गाळ््यांचा आहे. सहा नंबरच्या गाळ््यामध्ये कित्येक दिवसांपासून एका मोठ्या झाडाचा बुंधा अडकून पडला आहे. संबंधित विभागाने हा बुंधा बाजूला काढणे आवश्यक होते; पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. शेजारचा सात नंबरच्या गाळ््याच्या पिलरचा नदीच्या तळाकडील बाजूचा भाग कोसळला आहे. नदीपात्रात दगड विखरून पडले आहे.अनेक गाळ््यांतून पाणी साठविणाऱ्या प्लेटस् अडकविण्याच्या खाचा खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्या गाळ््यातून प्लेटस् बसविणे अवघड बनले आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही कडेला वरील बाजूस छोटे संरक्षक पिलर्स होते, पण त्यापैकी अनेक पिलर्स निकामी झाले आहेत. पुराच्यावेळी प्रवाशांना बंधाऱ्यावरून जाण्यासाठी हे छोटे पिलर्स दिशा दर्शकाची भूमिका बजावत होते.टेकडीवरील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला यापूर्वी मोठी भेग पडली होती. संबंधित विभागाने या ठिकाणी काही प्रमाणात डागडुजी केली होती, मात्र मजबुतीकरण झाले नाही, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे टेकवाडीकडील बाजूची झीज मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या बाजूला नदीलगत टेकडीवर मानवी वस्ती असल्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागावरसुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. (वार्ताहर)शेतातील पिके होरपळून जाण्याची भीतीबंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे पाणीसाठ्याअभावी शेकडो एकरांतील ऊस, भात, मका, सूर्यफूल पिके उन्हामुळे होरपळून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. उन्हाळी भात रोप लावणी केलेल्या वाफ्यात पाणीसाठा करणे कठीण बनले आहे. पिके कशी वाचवायची ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच वेतवडे, तिसंगी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे कुंभी नदीपलीकडील वेतवडे, बालेवाडी, मणदूर या गावांच्या वाहतुकीबरोबरच शेती, पिण्याचे पाणी यांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. अणदूर बंधारा पिलर कोसळल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. मणदूर पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे, तर आता वेतवडे बंधारा पिलर कोसळल्यामुळे धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि वाहतूक, शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. - मेघाराणी जाधव, जि. प. सदस्याउन्हाळ््यात वातावरण स्वच्छ असते, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक केले आहे. बंधाऱ्यात पाणीसाठाच नसल्यामुळे कोवळी भात रोपे कोमेजू लागली आहेत. सूर्यफूल आणि ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागली आहेत. संबंधित विभागाने बंधाऱ्याची डागडुगी त्वरित करावी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे.- रघुनाथ दगडू शिंदे,शेतकरी वेतवडे