शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:39 IST

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा ...

ठळक मुद्देकोल्हापुरातून महिनाअखेरपर्यंत विमान सेवा सुरू होण्याची शक्यतारनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम, विमान उपलब्धतेअभावी सेवेचा प्रारंभ लांबणीवर

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा केव्हा सुरू होणार, हा कोल्हापूरवासीयांना प्रश्न पडला आहे. संबंधित योजनेतील समावेशानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यातर्फे दि. २५ आणि २६ आॅक्टोबरला कोल्हापूरच्या विमानतळाची पाहणी केली. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘डीजीसीए’कडून कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

या विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री अशोक गजपती राजू यांनी दि. १५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दिली; पण याबाबतचे सध्याचे वास्तव पाहता विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.

कोल्हापुरातून विमानसेवा पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या कंपनीकडे साधारणत: दि. १८ डिसेंबरपर्यंत विमान उपलब्ध होईल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धावपट्टी रविवारपर्यंत बंदसध्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. त्यामुळे रविवार (दि. १७) पर्यंत धावपट्टी अधिकृतरीत्या बंद राहणार आहे. या दरम्यान, वातावरण ढगाळ राहिल्यास धावपट्टी बंद राहण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर