शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

टोल आंदोलकांवरील खटले मागे घेऊ : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:17 IST

‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे

ठळक मुद्दे पुन्हा आश्वासन : अंमलबजावणी का झाली नाही, पाहतोवीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवले

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले.टोल आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप देसाई, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, अशोक पोवार, किसन कल्याणकर अशा पाचजणांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची उजळाईवाडी विमानतळावर भेट घेतली आणि खटले मागे घेण्याबाबत निवेदन दिले. देसाई यांनी विमानतळावर भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार कागलला कार्यक्रमास जाण्यापूर्वी दोन मिनिटे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली.

टोल आंदोलकांवरील खटले काढून टाकण्याचे आश्वासन आपण दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वारंवार आंदोलकांना न्यायालयात येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. कार्यकर्त्यांची त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. तेव्हा आपण दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही केली जावी, अशी अपेक्षा दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली.त्याचवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही साहेब करून घ्यायला लागतंय, या खटल्यात मलाही दंड झाला होता, याची माहिती दिली. त्यावेळी ‘माझ्या लक्षात आहे. खटले मागे घेण्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मी तपासून घेतो आणि संबंधितांना तशा सूचना देतो’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह टोल विरोधात झालेल्या आंदोलनातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.वीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवलेप्रलंबित प्रश्न : निवेदन घेण्यासही टाळाटाळकोल्हापूर : कागल दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीसह पॉवर फॅक्टर पेनल्टीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नात लक्ष घालावे म्हणून विनंती करायला गेलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांची साधी दखलही घेतली नाही. निवेदन स्वीकारतो, चर्चा करतो म्हणून भेटीचे ठिकाण व वेळही दिली; पण प्रत्यक्षात निवेदनही स्वीकारले नाही. मुख्यमंत्र्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकांनी स्वीय साहाय्यकांकडे निवेदनाची प्रत देऊन भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या टोलवाटोलवीबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.उद्योजकांनी आधी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून, दौºयात भेट घेण्याची परवानगीही घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला विमानतळावर भेट घेण्याचे ठरले; पण विमान उशिरा येणार असल्याने कागलमध्ये पुतळा अनावरणाच्या ठिकाणी माळ बंगल्यावरच १५ मिनिटे चर्चा करू असे ठरले. त्याप्रमाणे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अतुल आरवाडे या उद्योजकांच्या प्रतिनिधींनी दुपारी एक वाजता माळ बंगला गाठला. तेथे आल्यावर भेटीबद्दल विचारले असता, मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर निवेदन स्वीकारू, असा निरोप स्वीय साहाय्यकाकडून आला. त्याप्रमाणे जयसिंगराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उद्योजक पोहोचले. भेट घेण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यक्रम संपल्यावर बघू, असे सांगण्यात आले. कार्यक्रम संपल्या संपल्या लगेच मुख्यमंत्री बाहेर पडून गाडीत बसत असताना उद्योजकांनी गाठल्यावर मुंबईत या, निवांत चर्चा करू, असे सांगून ते रेठरे बुद्रुकच्या कार्यक्रमाला निघून गेले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस