शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

टोल आंदोलकांवरील खटले मागे घेऊ : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:17 IST

‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे

ठळक मुद्दे पुन्हा आश्वासन : अंमलबजावणी का झाली नाही, पाहतोवीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवले

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले.टोल आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप देसाई, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, अशोक पोवार, किसन कल्याणकर अशा पाचजणांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची उजळाईवाडी विमानतळावर भेट घेतली आणि खटले मागे घेण्याबाबत निवेदन दिले. देसाई यांनी विमानतळावर भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार कागलला कार्यक्रमास जाण्यापूर्वी दोन मिनिटे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली.

टोल आंदोलकांवरील खटले काढून टाकण्याचे आश्वासन आपण दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वारंवार आंदोलकांना न्यायालयात येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. कार्यकर्त्यांची त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. तेव्हा आपण दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही केली जावी, अशी अपेक्षा दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली.त्याचवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही साहेब करून घ्यायला लागतंय, या खटल्यात मलाही दंड झाला होता, याची माहिती दिली. त्यावेळी ‘माझ्या लक्षात आहे. खटले मागे घेण्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मी तपासून घेतो आणि संबंधितांना तशा सूचना देतो’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह टोल विरोधात झालेल्या आंदोलनातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.वीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवलेप्रलंबित प्रश्न : निवेदन घेण्यासही टाळाटाळकोल्हापूर : कागल दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीसह पॉवर फॅक्टर पेनल्टीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नात लक्ष घालावे म्हणून विनंती करायला गेलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांची साधी दखलही घेतली नाही. निवेदन स्वीकारतो, चर्चा करतो म्हणून भेटीचे ठिकाण व वेळही दिली; पण प्रत्यक्षात निवेदनही स्वीकारले नाही. मुख्यमंत्र्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकांनी स्वीय साहाय्यकांकडे निवेदनाची प्रत देऊन भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या टोलवाटोलवीबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.उद्योजकांनी आधी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून, दौºयात भेट घेण्याची परवानगीही घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला विमानतळावर भेट घेण्याचे ठरले; पण विमान उशिरा येणार असल्याने कागलमध्ये पुतळा अनावरणाच्या ठिकाणी माळ बंगल्यावरच १५ मिनिटे चर्चा करू असे ठरले. त्याप्रमाणे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अतुल आरवाडे या उद्योजकांच्या प्रतिनिधींनी दुपारी एक वाजता माळ बंगला गाठला. तेथे आल्यावर भेटीबद्दल विचारले असता, मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर निवेदन स्वीकारू, असा निरोप स्वीय साहाय्यकाकडून आला. त्याप्रमाणे जयसिंगराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उद्योजक पोहोचले. भेट घेण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यक्रम संपल्यावर बघू, असे सांगण्यात आले. कार्यक्रम संपल्या संपल्या लगेच मुख्यमंत्री बाहेर पडून गाडीत बसत असताना उद्योजकांनी गाठल्यावर मुंबईत या, निवांत चर्चा करू, असे सांगून ते रेठरे बुद्रुकच्या कार्यक्रमाला निघून गेले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस