शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा - महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:22 IST

गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण

ठळक मुद्दे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शहरातील सांडपाणी बºयाच वेळा पंचगंगा नदीत मिसळत असते, त्यावेळी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य करण्यात येते. पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडतात; परंतु यावेळी झालेल्या नदी प्रदूषणास महानगरपालिका जबाबदार नाही. अन्य काही घटकांनी नदीमध्ये मळी किंवा रसायनेमिश्रित सांडपाणी सोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याला दुर्गंधी येते, तसाही प्रकार झाला असावा, असे सांगण्यात येते.

कारणे काहीही असली तरी शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांतून तसेच नगरसेवकांतून त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी होत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नदीतील पाण्याची तपासणी केली असता सकृत्दर्शनी पाण्याला वास येत असल्याचे आढळून आले. मात्र हे प्रदूषण कशामुळे झाले याचा शोध मात्र घेता आलेला नाही. म्हणून महापालिकेचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयास पत्र पाठवून प्रदूषण करणाºया घटकांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोगावती नदीचे हळदी, बहिरेवाडी, कोगे, शिंगणापूर, आदी ठिकाणी पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रदूषणाचे कारण अस्पष्ट आहे. पाण्यात कोणते घटक मिसळल्याने हे पाणी प्रदूषित झाले हे रासायनिक पृथक्क रणानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदी प्रवाहित करणे हा मात्र तातडीचा उपाय असून तो अमलात आणल्यास शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकेल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरriverनदी