शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

तपोवन, मानिनीच्या संचालकांवर कारवाई करा जिल्हा उपनिबंधकांचे आदेश : ‘सहा पतसंस्थांच्या अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठकीत झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:52 AM

कोल्हापूर : मानिनी पतसंस्थेचे दप्तर नसताना कर्जवसुलीचे काम केलेच कसे? असा सवाल करीत संचालकांसह संबंधित यंत्रणेकडून दप्तर ताब्यात घ्या, दिले नाही तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा,

कोल्हापूर : मानिनी पतसंस्थेचे दप्तर नसताना कर्जवसुलीचे काम केलेच कसे? असा सवाल करीत संचालकांसह संबंधित यंत्रणेकडून दप्तर ताब्यात घ्या, दिले नाही तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा, असा आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी अवसायकांना दिला. सरकारी पॅकेजसाठी मालमत्ता तारण दिलेल्या तपोवन पतसंस्थेच्या संचालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

भुदरगड नागरी, मानिनी, तपोवनसह अवसायनातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या वेदना ‘लोकमत’ने ‘मरणयातना ठेवीदारांच्या’ यातून मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी मंगळवारी भुदरगड, मानिनी, तपोवन, राजीव, महाराष्टÑ नागरीसह सहा पतसंस्थांच्या अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.

मानिनी पतसंस्थेवर दीड वर्षांपूर्वी अवसायक म्हणून एस. डी. चौगुले यांची नियुक्ती झाली; पण त्यांना दप्तर मिळालेले नाही. तरीही त्यांनी कर्जवसुलीचे काम केल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या निदर्शनास आले. ‘दप्तर नसताना कर्ज मिटवा-मिटवीची प्रकरणे कशी केली?’ अशी विचारणा काकडे यांनी केली. पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या प्रक्रियेत घेऊन दप्तर ताब्यात घ्या. संचालक व संबंधित यंत्रणेकडून दप्तर मिळाले नाही, तर सहकार ‘कलम ८०’नुसार संचालकांवर फौजदारी दाखल करा, असे स्पष्ट आदेशही त्यांनी अवसायक चौगुले यांना दिले.

तपोवन पतसंस्थेची वसुली झालेलीच नाही. चार हजार थकबाकीदारांकडे सुमारे पावणेतीन कोटींची वसुली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक थकबाकीदारांकडे अत्यल्प रक्कम आहे. संबंधितांकडे जाऊन वसुलीसाठी प्रयत्न करा.वसुलीसाठी अवसायकांनी यंत्रणा उभी करून त्याचा पाठलाग करा, त्या वसुलीतून ठेवीदारांचे पैसे देण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी अवसायकांना केल्या. राज्य सरकारने पतसंस्थांना पॅकेज दिले होते.

‘तपोवन’च्या संचालकांनी आपली मालमत्ता तारण देऊन सरकारकडून पैसे घेतलेले आहेत; पण पॅकेजची परतफेड केलेली नाही. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश काकडे यांनी संबंधितांना दिले.

भाडे दिले नाही म्हणून वाहनधारक पतसंस्थेचे दप्तर संबंधित मालकाने दिले नसल्याचे अवसायकांनी सांगितले. यावर त्यांच्याशी चर्चा करून दप्तर ताब्यात घेऊन वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. राजीव नागरी, महाराष्टÑ नागरी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.पंधरा दिवसाला द्यावा लागणार अहवालवर्ष-दीड वर्षे झाले तरी कर्जवसुली व ठेवपरतीचा आढावा उपनिबंधकांकडून घेतला जात नाही. ही गंभीर बाब असून दर पंधरवड्याला उपनिबंधकांनी या संबंधीचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे आदेशही अरुण काकडे यांनी दिले.अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना वसुली व ठेव परतीच्या सूचना दिल्या आहेत. ‘मानिनी’चे दप्तर नसल्याचे अवसायक चौगुलेंनी सांगितले. संबंधित संचालकांवर फौजदारी करून दप्तर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- अरुण काकडे (जिल्हा उपनिबंधक)