शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:40 IST

दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देतांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्लादोन्हीकडून परस्पर तक्रारी

कोल्हापूर : दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.करवीर पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तम संभाजी तांदुळकर (वय ३०) व आंबाजी तांदुळकर हे उपवडेपैकी तांदुळकरवाडी ) येथे एकमेंकांच्या शेजारी राहतात. रविवारी रात्री १० च्या सुमारास उत्तम शेजारी राहणाय्रा आंबाजी यांच्या दारात मोटरसायकल घेवून उभे होते.

आबाजी यांनी मोटरसायकलवरुन मागून येवून त्यांना जोराची धडक दिली. यवर उत्तम यांनी तुम्हाला दिसत नाही का असा जाब विचारला. यावर आंबाजी यांनी त्यांना शिवागाळ करण्यास सुरवात केली. याचवेळी संशयित राकेश तांबुळकर याने तेथे येवून उत्तम यांना लाथबुक्याने मारहाण करत डोक्यावर तलवार हल्ला केला.

याचवेळी उत्तम यांचे वडील संभाजी तांबुळकर यांंच्यावरही त्यांनी तलवार हल्ला केला. तसेच उत्तमचा भाऊ सचिन यालाही शिवीगाळ करुन मारहणा केली. या प्रकरणी राकेश तांबुळकर, आबाजी तांबुळकर, जयश्री तांबुळकर यांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर