शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:11 IST

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.

- हिंदकेसरी दीनानाथ सिंह -

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात, असा माझा अनुभव आहे. नाही प्रश्न सुटला तरी नवीन प्रश्न निर्माण होत नाही; परंतु तुम्ही जर वाद घालत बसलात तर जुना प्रश्न तिथेच राहतो व नवीन प्रश्न तयार होतो. मी पैलवान असूनही आयुष्यभर कायमच गोड बोलत आलो. हल्ली कुटुंब असो की समाज... लोकांच्या बोलण्यात दुसऱ्याला टोचणाºया भाषेचा वापर जास्त होताना दिसतो. सहज बघा, तुम्हाला कुणी विचारले की, ‘पैलवानजी आपण जेवलात का?’ त्याला ‘होय, मी आताच जेवलो,’ असे उत्तर अपेक्षित आहे; परंतु तसे मिळताना दिसत नाही. ‘अजून राहिलोय का?’ असे आव्हानात्मक प्रत्युत्तर मिळते. जे संवाद तोडणारे असते.

माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतो. ही गोष्ट १९९६ ची. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही एके दिवशी मंत्रालयात त्यांना सकाळी-सकाळी भेटायला गेलो; परंतु आधी वेळ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना आम्ही तिथेच ‘हिंदकेसरी’ असे मोठ्या अक्षरांत लिहून पत्र दिले. ते वाचून मुख्यमंत्री बैठक सोडून बाहेर आले. ‘महत्त्वाची बैठक असल्याने आज सकाळी मी गणेशदर्शन न घेता मंत्रालयात आलो; परंतु इथे तर साक्षात मारुतीच मला भेटायला आला आहे,’ असे सांगत त्यांनी हिंदकेसरी मारुती माने यांच्या हाताला धरून त्यांना आत नेले.

मी त्यांना म्हणालो, ‘मग तुम्ही देवाला उपाशी ठेवू नका. हिंदकेसरींच्या मानधनाचा विषय सोडवा.’ त्यावर त्यांनी ‘तुम्ही तुमच्या अध्यक्षांना (शरद पवार) का भेटला नाही?’ असे विचारले. ‘आम्ही त्यांना सहावेळा भेटलो; परंतु प्रश्न सुटलेला नाही,’ असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री मला म्हणाले, ‘पैलवानजी, आप बहुत मिठी बातें करते है!’ त्यावर मी म्हणालो, ‘सरजी, मैं बात भी मिठी करता हूँ, मेरा आचरण और चरित्र भी मिठा है।

मुख्यमंत्र्यांनी लगेच क्रीडा सचिवांना बोलाविले व त्वरित दरमहा एक हजार रुपये मानधन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यावर सचिवांनी ‘ते पुढील वर्षापासून करता येईल,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘पुढील नव्हे, तर मागील वर्षापासून मानधन मंजूर करा,’ असे आदेश दिले. त्या वेळेपासून आमचे मानधन सुरू झाले आणि तेदेखील फक्त चांगल्या बोलण्यामुळेच...!                                                                                                    - हिंदकेसरी दीनानाथ सिंह