शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तर कारखान्याची साखर रोखणार स्वाभिमानी

By admin | Updated: May 22, 2014 01:09 IST

शेतकरी संघटनेचा इशारा : पहिली उचल २६५० रुपयेसाठी १० जूनची डेडलाईन

 कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सन २०१३-१४ सालच्या ऊस गळीत हंगामात आंदोलनावेळी कारखान्यांकडून उसाला पहिली उचल २६५० रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्याचे ठरवून आंदोलन मागे घेतले होते. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी उर्वरित रक्कम १० जूनपर्यंत द्यावी, अन्यथा त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासो चौगुले व तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांनी पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या पाठीशी सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन शेतकर्‍यांची ताकद दाखविली आहे. मात्र, राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असे सांगून ते म्हणाले, यंदा जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी १ कोटी ७६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गाळपापूर्वी उसाला १७०० रुपयांपेक्षा जादा दर देता येणार नाही, असे म्हणणार्‍या साखर कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’च्या दीड महिन्यांच्या आंदोलनानंतर दोन टप्प्यांमध्ये पहिली उचल २६५० देण्याचा निर्णय घेऊन गाळपाला सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या उचलीतील २२५० रुपये, तर काही साखर कारखान्यांनी कमी-जास्त दर दिला. कारखान्याचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम अद्याप कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. त्यासाठी कारखाना व्यवस्थापकांना १० जूनची डेडलाईन देण्यात येत असून, आंदोलना दरम्यान ठरल्याप्रमाणे जे साखर कारखाने पहिली उचल देत नाहीत, त्यांच्याविरोधात खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्पा म्हणून साखर कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एकही पोते बाहेर सोडणार नाही. आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी जि. प.चे बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पै. विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, के. आर. चव्हाण, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, मनोहर पुजारी, सागर शंभूशेट्टी, सागर चिप्परगे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)