शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ संघटना स्वबळावर लढणार

By admin | Updated: February 5, 2017 00:15 IST

भाजपशी फारकत : शिरोळमधील वाटाघाटीच केंद्रस्थानी

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जागांबाबतच तडजोड न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय शनिवारी अधिकृतपणे जाहीर केला. हा निर्णय जाहीर करून संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून प्रचाराचे रणशिंगही फुंकले. शिरोळ तालुक्यातील सात जागांवरच स्वाभिमानी व भाजपमध्ये मतैक्य न झाल्याने ही युती होऊ शकली नाही. आता त्याबाबत पुन्हा चर्चा व बैठका न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.स्वाभिमानी संघटना स्वबळावरच लढणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वप्रथम दिले होते; कारण भाजपने त्या पक्षाशी आघाडी करण्यासाठी चर्चाच केलेली नव्हती; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता आणावयाची झाल्यास संघटना बाजूला जाऊन चालणार नाही, असे वाटल्यावर मग संघटनेशी बोलणी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार शेट्टी यांच्यात शुक्रवारी (दि. ३) मॅरेथॉन चर्चा झाली; परंतु त्यातून तोडगा न निघाल्याने संघटनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.संघटनेने जिल्हा परिषदेच्या २२ व पंचायत समितीच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यातील निम्मे उमेदवार जाहीर केले आहेत. आज, रविवारी उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.हा दांभिकपणा कशाला?बैठकीत पालकमंत्र्यांनी संघटनेपुढे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्यावर खासदार शेट्टी यांनी त्यास कडाडून विरोध केला. हा दांभिकपणा आम्हाला जमणार नाही. लढायचे असेल आघाडी करून, नाहीतर स्वतंत्रपणे, असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर चर्चाच थांबली. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर हे फार जुने कार्यकर्ते आहेत; अशोकराव माने हे सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत, असे पालकमंत्री सांगत होते. त्यास ‘त्यांना तुम्ही पक्षात घेताना आम्हाला विचारून घेतले होते का?’ अशी विचारणा शेट्टी यांनी केली. ‘तुम्ही आयात केलेल्या माणसांसाठी आम्ही संघटनेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेने कुणाशीच आघाडी करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. कार्यकर्ता हीच माझी संपत्ती व ताकद आहे. त्यांच्या आग्रहाखातर स्वबळावर लढण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत. हा तालुका संघटनेचा बालेकिल्ला आहे. आताही त्यांच्याकडे त्यातील आठपैकी पाच जागा आहेत व दत्तवाडमधून आदिनाथ हेमगिरे हे ४१ मतांनी पराभूत झाले होते. मात्र, भाजपने तिथे संघटनेला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. २ नांदणीत राजवर्धन निंबाळकर व आलास मतदारसंघातून उल्फतबी मकानदारांना भाजपने आश्वासन दिल्याने तिथे भाजपला मैत्रीपूर्ण निवडणूक हवी होती व शिरोळला अशोकराव माने व अब्दुललाटमधून विजय भोजे यांच्यासाठी हे मतदारसंघ भाजपला हवे होते. ३ दानोळी, दत्तवाड व उदगाव येथे भाजप हा शिवसेनेशी छुपी युती करून आपल्याला अडचणीत आणण्याची खेळी करीत असल्याचा स्वाभिमानीला संशय होता. संघटनेशी युती तुटल्यावर लगेचच शनिवारी भाजप व शिवसेनेची युती झाली, हा त्याचा पुरावाच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन जागांसाठी भाजपशी आघाडी करण्याची गरजच काय, असा विचार करून संघटनेने वेगळी वाट शोधली.