शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘स्वाभिमानी’ संघटना स्वबळावर लढणार

By admin | Updated: February 5, 2017 00:15 IST

भाजपशी फारकत : शिरोळमधील वाटाघाटीच केंद्रस्थानी

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जागांबाबतच तडजोड न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय शनिवारी अधिकृतपणे जाहीर केला. हा निर्णय जाहीर करून संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून प्रचाराचे रणशिंगही फुंकले. शिरोळ तालुक्यातील सात जागांवरच स्वाभिमानी व भाजपमध्ये मतैक्य न झाल्याने ही युती होऊ शकली नाही. आता त्याबाबत पुन्हा चर्चा व बैठका न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.स्वाभिमानी संघटना स्वबळावरच लढणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वप्रथम दिले होते; कारण भाजपने त्या पक्षाशी आघाडी करण्यासाठी चर्चाच केलेली नव्हती; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता आणावयाची झाल्यास संघटना बाजूला जाऊन चालणार नाही, असे वाटल्यावर मग संघटनेशी बोलणी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार शेट्टी यांच्यात शुक्रवारी (दि. ३) मॅरेथॉन चर्चा झाली; परंतु त्यातून तोडगा न निघाल्याने संघटनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.संघटनेने जिल्हा परिषदेच्या २२ व पंचायत समितीच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यातील निम्मे उमेदवार जाहीर केले आहेत. आज, रविवारी उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.हा दांभिकपणा कशाला?बैठकीत पालकमंत्र्यांनी संघटनेपुढे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्यावर खासदार शेट्टी यांनी त्यास कडाडून विरोध केला. हा दांभिकपणा आम्हाला जमणार नाही. लढायचे असेल आघाडी करून, नाहीतर स्वतंत्रपणे, असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर चर्चाच थांबली. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर हे फार जुने कार्यकर्ते आहेत; अशोकराव माने हे सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत, असे पालकमंत्री सांगत होते. त्यास ‘त्यांना तुम्ही पक्षात घेताना आम्हाला विचारून घेतले होते का?’ अशी विचारणा शेट्टी यांनी केली. ‘तुम्ही आयात केलेल्या माणसांसाठी आम्ही संघटनेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेने कुणाशीच आघाडी करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. कार्यकर्ता हीच माझी संपत्ती व ताकद आहे. त्यांच्या आग्रहाखातर स्वबळावर लढण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत. हा तालुका संघटनेचा बालेकिल्ला आहे. आताही त्यांच्याकडे त्यातील आठपैकी पाच जागा आहेत व दत्तवाडमधून आदिनाथ हेमगिरे हे ४१ मतांनी पराभूत झाले होते. मात्र, भाजपने तिथे संघटनेला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. २ नांदणीत राजवर्धन निंबाळकर व आलास मतदारसंघातून उल्फतबी मकानदारांना भाजपने आश्वासन दिल्याने तिथे भाजपला मैत्रीपूर्ण निवडणूक हवी होती व शिरोळला अशोकराव माने व अब्दुललाटमधून विजय भोजे यांच्यासाठी हे मतदारसंघ भाजपला हवे होते. ३ दानोळी, दत्तवाड व उदगाव येथे भाजप हा शिवसेनेशी छुपी युती करून आपल्याला अडचणीत आणण्याची खेळी करीत असल्याचा स्वाभिमानीला संशय होता. संघटनेशी युती तुटल्यावर लगेचच शनिवारी भाजप व शिवसेनेची युती झाली, हा त्याचा पुरावाच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन जागांसाठी भाजपशी आघाडी करण्याची गरजच काय, असा विचार करून संघटनेने वेगळी वाट शोधली.