शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Swabimani Shetkari Sanghatna- उंब्रजमध्ये स्वाभिमानीने राज्य मार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:39 IST

Swabimani Shetkari Sanghatna Satara-वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, अशी समज दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीज बिले आघाडी सरकारने तत्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.

ठळक मुद्दे वीज बिले माफ करण्याची मागणी अधिकाऱ्यांना निवेदन, घोषणांनी परिसर दणाणला

उंब्रज : वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, अशी समज दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीज बिले आघाडी सरकारने तत्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केली. त्यानंतर वीज वितरण विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, विक्रमसिंह कदम, इंद्रजीत जाधव, सुरेश पाटील, वसंत पाटील, शरद जाधव, महेश जाधव, दत्ता थोरात, अभिजित जाधव दिग्विजय कदम व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनकर्त्यांनी मोर्चास सुरुवात केली. चौकातून वीज वितरण कार्यालयापर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाटण पंढरपूर राज्य मार्ग काहीकाळ रोखला. दरम्यान आंदोलकांनी वीज वितरणचे अभियंता कुंभार यांना निवेदन दिले. वीज बिल माफ करून सक्तीची वसुली थांबवावी, ज्यांची वीज कपात केली आहे ती त्वरित जोडून द्यावीत, वीजबिलात संपूर्ण माफी मिळावी, लॉकडाऊन कालावधीत दिलेली अंदाजे वीज बिले मागे घ्यावीत, अशी मागणी केली.यावेळी दादासाहेब यादव म्हणाले, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाराष्ट्रातील जनतेने वीज बिल माफीसाठी सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. लोकांना वीज बिले दिली गेली नाहीत तसेच ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याबाबत सूतोवाच केले. परंतु सरकारने पलटी मारून सक्तीची वसुली सुरू केली आहे. वीज कनेक्शन तोडणे चालू केले आहे.वस्तुतः बऱ्याच सरकारने वीज बिलात ५० टक्के पर्यंत सूट दिलेली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने कोणतीही माफी दिलेली नाही. उलट अंदाजित व चुकीची वीजबिले लोकांना दिल्याने त्याचा नाहक त्रास होत आहे. कृषिपंपाच्या वीज बिलाबाबत ५०टक्के माफी केली, परंतु मध्यंतरी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केलेले आहेत.देवानंद पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या अन्याय कारक वीज बिल वसुलीच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात वादळ, पाऊस, गारपीट,पूरपरिस्थिती, पिकांवर येणारी रोगराई व कीड,आणि त्यातून मिळणारा हमीभाव याचा मेळ घालताना सर्व सामान्य शेतकरी हवालदिल झालेला आहे.

कोरोना या रोगाचे जागतिक संकट आले,त्या संकटाचा सामना करताना त्यातून शेतकरी राजा सुटला नाही. त्याचा भाजीपाला व इतर माल कवडी मोलाने विकावा लागला. त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. काळ्या आईची सेवा करत कष्ट करीत राहिला या शेतकऱ्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज बिल माफ करावे, अशी मागणी केलेली आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज बाजारपेठ व महावितरण कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर