शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

सर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी विम्याची रक्कम मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:18 IST

सर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी कोल्हापूरमधील पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. तातडीने मदत देण्याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही एक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार पूरग्रस्त व्यावसायिक आणि व्यापाºयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी (दि. ९ नोव्हेंबर) केली आहे.

ठळक मुद्देसर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी विम्याची रक्कम मिळेनापूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांची तक्रार; राज्यपालांना पाठविले निवेदन

कोल्हापूर : सर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी कोल्हापूरमधील पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. तातडीने मदत देण्याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही एक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार पूरग्रस्त व्यावसायिक आणि व्यापाºयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी (दि. ९ नोव्हेंबर) केली आहे.आॅगस्टमधील महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक अशा विविध घटकांना बसला. शहरातील व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क, शाहूपुरी, आदी परिसरातील ज्या पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांनी विमा उतरविला होता, अशा विमाधारकांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश शासनाने विमा कंपन्यांना दिले होते. त्यानंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतर विमा कंपन्यांच्या सर्व्हेअर यांनी पूरबाधित क्षेत्रातील दुकानांचा सर्व्हे करून त्यांची छायाचित्रे काढून नेली.

सर्व्हेअर यांच्याबरोबरच संबंधित व्यापारी, व्यावसायिकांनी नुकसानभरपाईपोटीच्या रकमेबाबतचा अहवाल विमा कंपन्यांना सादर केला. मात्र, त्यातील एका कंपनीच्या शाहूपुरी शाखेतील अधिकारी नुकसानभरपाईची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांकडून झाली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

अशा स्थितीत विमा रक्कम महत्त्वाचा आधार ठरणारी आहे. ती देण्याबाबत विमा कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. याबाबत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या व्यापारी, व्यावसायिकांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जाणीवपूर्वक त्राससाहित्य खरेदीची बिले अथवा कोटेशनची मागणी करून या विमा कंपनीतील अधिकारी भरपाई देण्याबाबत असमर्थता दाखवत आहेत. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, नागाळा पार्क परिसरात पुराचे पाणी चार दिवस होते. त्यामध्ये सर्व प्रकारची कागदपत्रे नष्ट झाली आहेत. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना तसे निदर्शनास आणून दिले आहे. पूरग्रस्तांना तत्काळ मदत देण्याबाबत शासनाचे आदेश असूनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची तक्रार या पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी केली आहे.कोल्हापूर चेंबर’शी संपर्क साधावापूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना विम्याची रक्कम मिळाली आहे. ज्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही, त्यांनी ‘कोल्हापूर चेंबर’च्या कार्यालयात संपर्क साधावा. आपली माहिती द्यावी. त्यांना विम्याची रक्कम मिळवून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरुवारी केले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  •  जिल्ह्यातील पूरबाधित व्यापारी, उद्योजकांची संख्या : सुमारे तीन हजार
  • विमा रक्कम मिळालेल्यांचे प्रमाण : सुमारे ७० टक्के
  •  विमा रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे प्रमाण : सुमारे ३० टक्के

 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर