शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Maharashtra Assembly Election 2019 : ‘नवं कोल्हापूर’साठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:12 IST

रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.

ठळक मुद्दे‘नवं कोल्हापूर’ घडविण्यासाठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया ‘यूथ कनेक्ट’द्वारे साधला तरुणाईशी संवाद

कोल्हापूर : रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात त्यांनी तरुणाईशी संवाद साधला.

येथील हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया हॉलमधील या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, बाजीराव खाडे, प्रतिमा सतेज पाटील, काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.

रोजगारनिर्मिती करणे दूरच राहिले, उलट भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील २२२० उद्योग बंद पडले असल्याची टीका ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. मुंबई-बंगलोरमधील ‘स्वीट पॉट’ हे कोल्हापूर आहे. येथे कृषीप्रक्रिया उद्योगांसाठी चांगली संधी असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

‘मिशन रोजगार’ घेवून आलेल्या ऋतुराज या नवयुवकाला संधी द्या, त्याच्या कार्यक्षमतेतून ‘नवं कोल्हापूर’ निर्माण होईल. आपल्या सर्वांची साथ, पाठबळावर ऋतुराज हा नक्की आमदार होईल, असा मला विश्र्वास आहे. चांगले भविष्य घडवायचे असेल, तर इतिहास विसरु नका. भीती आणि चिंता मनातून काढून उत्सुकता, धैर्य बाळगा. शिक्षणाला अनुभवाची जोड देवून इतिहास लक्षात घेवून वर्तमानात राहून भविष्य घडवा, असे आवाहन सिंधिया यांनी केले.

या कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांच्या ‘मिशन रोजगार’ संकल्पपत्राचे सिंधिया यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सुमारे पाच हजार युवक-युवती संघटीत झालेल्या ‘फ्रेंडस आॅफ ऋतुराज’ या मोहिमेचा बँड प्रतिनिधीक युवक-युवतींनी सिंधिया यांना बांधला. यावेळी पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, आदींसह तरुणाई उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. महादेव नरके, राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले. 

 

टॅग्स :kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणcongressकाँग्रेस