शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

ऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:48 IST

ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार संघटनेच्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून, कामगारांचे होणारे नुकसान थांबले आहे.

ठळक मुद्देऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणारसाखर संघाच्या बैठकीत निर्णय : तोडणी कामगार संघटनेच्या लढ्याला यश

कोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार संघटनेच्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून, कामगारांचे होणारे नुकसान थांबले आहे.हंगाम सुरू होण्याआधी दरवर्षी ऊसतोडणी-ओढणीचा दर सरकार निश्चित करते. दर तीन वर्षांतून एकदा सामंजस्य करार केला जात होता;, पण राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा करार तीनऐवजी पाच वर्षांतून एकदा केला जाईल, असा निर्णय घेतला.

हे करताना त्यांनी कामगार संघटनेलाही विश्वासात घेतले नाही. तेव्हापासून संघटनेने हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे तीन वर्षांचा करार करावा, अशी मागणी केली होती. करार तातडीने न झाल्यास कोयता हातात घेणार नाही, अशा इशाराही संघटनेने दिला होता.या पार्श्वभूमीवर राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीस संघटनेचे सुभाष जाधव यांनी कराराच्या मुदतीचा प्रश्न उपस्थित करून कामगारांचे होणारे नुकसान दृष्टिपथात आणून दिले.

यावर दांडेगावकर यांनी होकार दर्शवत येथून पुढे करार तीन वर्षे मुदतीचाच असेल, असे स्पष्ट केले. बैठकीत उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीराम शेटे, पंकजा मुंडे, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते. संघटनेच्या वतीने प्रा,. डॉ. सुभाष जाधव, आबासाहेब चौगले यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.दरवाढीबाबत पुन्हा एकदा बैठककल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करून कामगारांची नोंदणी करा. तोडणी दर टनाला ४०० रुपये करा. वाहतूक दरात ५० टक्के वाढ करा. मुकादम कमिशन २५ टक्के करा, कोविड सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध करून द्या, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या. यावर साखर संघाचे संचालक मंडळ व कारखाना प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू, असे दांडेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर