शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

ऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:48 IST

ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार संघटनेच्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून, कामगारांचे होणारे नुकसान थांबले आहे.

ठळक मुद्देऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणारसाखर संघाच्या बैठकीत निर्णय : तोडणी कामगार संघटनेच्या लढ्याला यश

कोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार संघटनेच्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून, कामगारांचे होणारे नुकसान थांबले आहे.हंगाम सुरू होण्याआधी दरवर्षी ऊसतोडणी-ओढणीचा दर सरकार निश्चित करते. दर तीन वर्षांतून एकदा सामंजस्य करार केला जात होता;, पण राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा करार तीनऐवजी पाच वर्षांतून एकदा केला जाईल, असा निर्णय घेतला.

हे करताना त्यांनी कामगार संघटनेलाही विश्वासात घेतले नाही. तेव्हापासून संघटनेने हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे तीन वर्षांचा करार करावा, अशी मागणी केली होती. करार तातडीने न झाल्यास कोयता हातात घेणार नाही, अशा इशाराही संघटनेने दिला होता.या पार्श्वभूमीवर राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीस संघटनेचे सुभाष जाधव यांनी कराराच्या मुदतीचा प्रश्न उपस्थित करून कामगारांचे होणारे नुकसान दृष्टिपथात आणून दिले.

यावर दांडेगावकर यांनी होकार दर्शवत येथून पुढे करार तीन वर्षे मुदतीचाच असेल, असे स्पष्ट केले. बैठकीत उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीराम शेटे, पंकजा मुंडे, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते. संघटनेच्या वतीने प्रा,. डॉ. सुभाष जाधव, आबासाहेब चौगले यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.दरवाढीबाबत पुन्हा एकदा बैठककल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करून कामगारांची नोंदणी करा. तोडणी दर टनाला ४०० रुपये करा. वाहतूक दरात ५० टक्के वाढ करा. मुकादम कमिशन २५ टक्के करा, कोविड सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध करून द्या, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या. यावर साखर संघाचे संचालक मंडळ व कारखाना प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू, असे दांडेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर