शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:07 IST

ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो

ठळक मुद्देऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

सावरवाडी : तब्बल एक महिनाभर शेतीला पाणीपुरवठा झाला नसल्याने शेतीमध्ये भेंगा पडल्याने ऊस पीके वाळत आहेत . ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरळीत सुरु झाल्या नाहीत .  शेतीच्या पाणीवाटपामध्ये नियोजनाचा अभाव आढळत आहे . शेतीस अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने करवीर तालुक्यात ऐन नोव्हेबर महिन्यात शेतीतील उभे ऊस पीके करपली आहेत . शेतकरी चिंतातुर बनाला आहे .      ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो .

 सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पाणीवाटपात  अकार्यक्षमतेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे .. विलंबाने सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरु झाल्याने शेतीला भेगा पडल्याने पाण्याचे फेर वेळेवर पूर्ण होत नाहीत  भोगावती तुळशी नद्याच्या पात्रात पाणी असुनही शेतीला पाणी मिळत नाही .परिणामी अडसाली ऊस .भात क्षेत्रातील लागणी करणे यांना पाणी मिळत नाही .परिणामी लागणीचा हंगाम लांबल्याने याला जबाबदार कोण?हा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उभा आहे .ऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

  •  तालुक्यातील कसबा बीड, महें, कोगे, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, आदिभागात उभे ऊसपीकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ लागले आहे . पाणीपट्टीचे दर वाढले असुन त्यानुसार शेतीला पाणी मिळत नाही याचा परिणाम शेतीच्या अर्थव्यवस्थेवर बसत आहे . शेतकऱ्यांचे शेतीच्या व्यवसायात नुकसान संभवते . शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचा सुर शेतकरी वर्गातुन उमटू लागला आहे

या वर्षी महापुर, अतिवृष्टी,परतीचा पाऊस, ऊस पाणीटंचाई याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे . पाणीपुरवठा संस्थांनी शेतीची पाणीपट्टीचे दर, कमी करावे . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .= वाळलेल्या ऊसाला नुकसान भरपाई हवी !

  • नोव्हेंबर महिन्यात वाळलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांनी पंचनामे करून ऊस पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

 

तीव्र आंदोलन छेडणार !ऊस पिकांना पाणी न मिळास शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून शेतकरी मेळावा घेऊन निबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार  !दिनकर सुर्यवंशी,( महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्य कौन्सील सदस्य )

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात