शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखर खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर, सहकारमंत्र्यांची माहिती : सरकार साखर खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:56 IST

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी शासन कारखान्यांकडील २५ टक्के साखर खरेदी करणार असून

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी शासन कारखान्यांकडील २५ टक्के साखर खरेदी करणार असून त्याचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.

हा प्रस्ताव साखर आयुक्तांनी तयार केला आहे. त्याची तपासणीही पूर्ण झाली आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीसमोर तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. या महिन्याअखेरपर्यंत साखर खरेदीची प्रक्रिया सुरू होईल, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.मंत्री देशमुख यांनीच हा मूळ प्रस्ताव २ फेब्रुवारीस मांडला होता व त्यावेळी २० फेब्रुवारीपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्यादृष्टीने पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. मध्यंतरीस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेऊन या प्रक्रियेस गती द्यावी, असा आग्रह धरला होता. बुधवारी कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन कमी केल्याने कारखानदारी अडचणीत आली असून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे साखर खरेदी करावी, अशी मागणी केली होती म्हणून या प्रस्तावाचे नेमके काय झाले अशी विचारणा ‘लोकमत’ने सहकार मंत्र्यांकडे केली. राज्य सरकार कारखान्यांकडील २५ टक्के साखर ३२०० रुपयांनी घेणार आहे. यंदा राज्यात आठ कोटी क्विंटल साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, त्यातील दोन कोटी क्विंटल साखर सरकार घेणार आहे. त्यासाठी ६४०० कोटी रुपयांची तरतूद सरकारला करावी लागेल.

तर एफआरपी देणे शक्यहंगाम सुरू झाला तेव्हा सरासरी ३६०० रुपयांपर्यंत साखरेचा दर होता; त्यामुळे कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त २००-३०० रुपये ऊसदर देण्याची घोषणा केली आहे; परंतु साखरेचे दर घसरले आहेत. त्यामुळे एफआरपी देणेही कारखान्यांना अडचणीचे ठरत आहे.सरकारने साखर खरेदी केल्यास कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. महाराष्ट्रातून महिन्याला सहा लाख टन साखर विक्री होते. त्या हिशेबाने तीन महिन्यांची साखर सरकारच घेणार असल्याने कारखान्यांवर साखर विक्रीचा दबाव राहणार नाही. ३२०० रुपयांनी साखर खरेदी झाल्यास किमान एफआरपी देणे शक्य होईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा फायदा आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर