शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

साखर खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर, सहकारमंत्र्यांची माहिती : सरकार साखर खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:56 IST

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी शासन कारखान्यांकडील २५ टक्के साखर खरेदी करणार असून

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी शासन कारखान्यांकडील २५ टक्के साखर खरेदी करणार असून त्याचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.

हा प्रस्ताव साखर आयुक्तांनी तयार केला आहे. त्याची तपासणीही पूर्ण झाली आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीसमोर तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. या महिन्याअखेरपर्यंत साखर खरेदीची प्रक्रिया सुरू होईल, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.मंत्री देशमुख यांनीच हा मूळ प्रस्ताव २ फेब्रुवारीस मांडला होता व त्यावेळी २० फेब्रुवारीपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्यादृष्टीने पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. मध्यंतरीस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेऊन या प्रक्रियेस गती द्यावी, असा आग्रह धरला होता. बुधवारी कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन कमी केल्याने कारखानदारी अडचणीत आली असून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे साखर खरेदी करावी, अशी मागणी केली होती म्हणून या प्रस्तावाचे नेमके काय झाले अशी विचारणा ‘लोकमत’ने सहकार मंत्र्यांकडे केली. राज्य सरकार कारखान्यांकडील २५ टक्के साखर ३२०० रुपयांनी घेणार आहे. यंदा राज्यात आठ कोटी क्विंटल साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, त्यातील दोन कोटी क्विंटल साखर सरकार घेणार आहे. त्यासाठी ६४०० कोटी रुपयांची तरतूद सरकारला करावी लागेल.

तर एफआरपी देणे शक्यहंगाम सुरू झाला तेव्हा सरासरी ३६०० रुपयांपर्यंत साखरेचा दर होता; त्यामुळे कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त २००-३०० रुपये ऊसदर देण्याची घोषणा केली आहे; परंतु साखरेचे दर घसरले आहेत. त्यामुळे एफआरपी देणेही कारखान्यांना अडचणीचे ठरत आहे.सरकारने साखर खरेदी केल्यास कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. महाराष्ट्रातून महिन्याला सहा लाख टन साखर विक्री होते. त्या हिशेबाने तीन महिन्यांची साखर सरकारच घेणार असल्याने कारखान्यांवर साखर विक्रीचा दबाव राहणार नाही. ३२०० रुपयांनी साखर खरेदी झाल्यास किमान एफआरपी देणे शक्य होईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा फायदा आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर