शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ, मंत्रिगटाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 03:19 IST

नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या या बैठकीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अन्नमंत्री रामविलास पास्वान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते.

कोल्हापूर : साखरेचा किमान विक्रीदर दोन रुपयांनी वाढवून प्रतिकिलो ३३ रुपये करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने बुधवारी केली. सन २०१९-२० या हंगामातील सुमारे २० हजार कोटींची थकीत उसाची बिले कारखान्यांना देता यावीत, यासाठी ही शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही दरवाढ थोडा फार दिलासा देणारी असली तरी असमाधानकारक असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त झाली.नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या या बैठकीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अन्नमंत्री रामविलास पास्वान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते. शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले लवकरात लवकर कारखान्यांकडून कशी अदा केली जातील, याविषयीच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होऊन साखरेच्या विक्री दरात वाढ करण्याच्या शिफारशींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातील नीती आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवावा, असे आदेशही मंत्रिगटाने दिले. साखर विक्री दरात वाढ करूनही ऊस उत्पादकांना थकीत बिले देण्यास अपयश आले, तर सरकार अन्य पर्यायांचीही विचार करेल, असेही सूत्रांनी सांगितले.कसा ठरविला जातो दरउसाची एफआरपी (रास्त आणि वाजवी किंमत) आणि सक्षम साखर कारखान्यांचा किमान उत्पादनखर्च विचारात घेऊन साखरेचा किमान विक्री दर ठरविण्याची पद्धत जून २०१८ पासून केंद्र सरकारने सुरू केली आहे. सुरुवातीला २९ रुपये दर ठरविण्यात आला होता. गेल्यावर्षी त्यात दोन रुपयांची वाढ करून तो ३१ रुपये करण्यात आला होता. बुधवारी त्यात आणखी दोन रुपये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली.येत्या हंगामात एफआरपीतील वाढीमुळे टनामागे १०० रुपये शेतकऱ्यांना जादा द्यावे लागणार आहेत. त्यामुळे किलोमागे २ रुपये वाढ करूनही कारखान्यांपुढील अडचणी संपणार नाहीत. त्यामुळे ३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री दर देण्याच्या मागणीचा विचार सरकारने केला पाहिजे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञही वाढ असमाधानकारक आहे. ३३ रुपयाने साखर विकली तरी कारखान्यांना दीड ते दोन रुपये तोटा होणार आहे. साखरेचे ग्रेडनिहाय दर निश्चित करावेत, या मागणीचा विचार केला गेलेला नाही.- प्रकाश नाईकनवरे,व्यवस्थापकीय संचालक, राष्टÑीय साखर कारखाना महासंघ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर