शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची महसूलवाढीसाठी साखरपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:50 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. तसेच जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी असलेली वाहतूक भाड्यातील १५ टक्के सवलत एक आॅक्टोबरनंतरही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि साखर कारखान्यांना होणार आहे.देशांतर्गत बाजारपेठेत दर महिन्याला सुमारे २० लाख टन साखरेची विक्री होते. कारखाना कार्यस्थळापासून ही साखर देशभर पोहोचविण्यासाठी रेल्वे एक प्रमुख साधन आहे. अलीकडच्या काळात साखर वाहतुकीला ट्रक्स आणि इतर साधनेही उपलब्ध झाल्याने रेल्वेद्वारे होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यातील जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत मालवाहतूक कमी असते. त्यामुळे हा काळ मालवाहतुकीचा कृशकाळ समजला जातो. मालवाहतुकीच्या भाड्याद्वारे महसूल वाढावा, यासाठी रेल्वे दरवर्षी साखरेच्या वाहतुकीवर १५ टक्के सवलत देते. ही सवलत यंदा एक आॅक्टोबरनंतर म्हणजेच साखरेच्या नव्या हंगामातही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मिनी रेक आणि टू पॉईंट साखरेच्या वाहतुकीसाठी आकारला जाणारा पाच टक्के अधिभारही रेल्वेने रद्द केला आहे.रेक, मिनी रेक आणि टू पॉईंटएक रेक म्हणजे रेल्वेच्या ४२ वाघिणी किंवा डबे. त्यातून २६ हजार टन साखरेची वाहतूक होते. मिनी रेक म्हणजे रेल्वेच्या २१ वाघिणी, तर टू पॉर्इंट म्हणजे रेल्वेतून नेली जाणारी साखर २०० किलोमीटरच्या आत दोन ठिकाणी उतरविणे. मिनी रेक आणि टू पॉईंट वनद्वारे साखरेची वाहतूक करताना रेल्वेला कमी भाडे मिळते. त्यामुळे या दोन दोन प्रकारच्या वाहतुकीवर पाच टक्के अधिभार आकारला जात होता.कोल्हापुरातून होणाऱ्या साखरेच्या वाहतुकीत मोठी घटकोल्हापुरातून पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांत साखर मोठ्या प्रमाणात जाते. यंदा महापूर आणि अन्य कारणांमुळे कोल्हापुरातून होणारी साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात १ लाख ३६ हजार ५७ टन साखरेची वाहतूक झाली होती. यावर्षी ती १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात फक्त २९ हजार २४४ टन इतकी झाली आहे.महाराष्टÑातील साखर महागमहाराष्ट्रातील साखर कारखान्यांची रेल्वेने होणारी वाहतूक घटण्याचे कारण म्हणजे व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशातील साखर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पाठविणे अंतर कमी असल्याने स्वस्त पडते. त्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर अंतर जादा असल्याने महाग पडते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील साखर गुजरात, राजस्थानमधील शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी ट्रकचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे साखरेची वाहतूक रेल्वेने होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापुरातून रेल्वेद्वारे होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे. रेल्वेने दिलेल्या सवलतीचा साखर व्यापाºयांनी लाभ घ्यावा.- एल. एन. मेश्रामसीजीएस, कोल्हापूर रेल्वे गुड्स यार्ड