शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

कारखानदार २०% रकमेची साखर शेतकऱ्यांना देणार-साखर आयुक्तांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:38 IST

कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला.

ठळक मुद्देएफआरपी न दिल्यास कारवाई होणारच

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकºयांकडून अर्ज मागवून साखर वाटप करणार आहेत.

सध्या ऊसदराची विचित्र कोंडी झाली आहे. बाजारात साखरेला दर नाही म्हणून केंद्र शासनाने क्विंटलचा दर २९०० रुपये निश्चित करून दिला व त्याच्या जोडीला देशातून ५० लाख टन साखरेचा कोटा निर्यातीसाठी निश्चित करून दिला; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर १९०० च्या सुमारास आहेत. शिवाय विविध अनुदानापोटी टनास ८०० रुपये मिळतात. म्हणजे टनास २६०० रुपयांपर्यंत रक्कम मिळते. परंतु देशांतर्गत बाजारात २९०० रुपये दर असताना मी कशाला निर्यात करू अशी समजूत करून कारखानदार साख्नर तश्ीच ठेवून बसले आहेत. परिणामी, देशांतर्गत बाजारातील साखर हलायला व त्यामुळे दर वाढायलाही तयार नाही. त्याचा परिणाम म्हणून कारखान्यांना एकरकमी देण्यास अडचणी येत आहेत. त्याबद्दल साखर आयुक्तांनी साखर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यातून कसा मार्ग काढायचा यासाठी कारखान्यांचे शिष्टमंडळ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर संकुलमध्ये आयुक्त गायकवाड यांना भेटले. या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील यांच्यासह अन्य कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश होता.

कोल्हापूर जिल्ह्णातील कारखानदारीचा वेळेत बिले देण्याचा लौकिक आहे. आजपर्यंत एफआरपी तरी दिलीच आहे, त्याशिवाय अनेकदा त्याहून जास्त पैसे शेतकºयांना कारखान्यांनी दिलेले आहेत. यावर्षी आर्थिक अडचण असल्याने मधला मार्ग म्हणून आता ८० टक्के रक्कम आम्ही देत आहोत. उर्वरित २० टक्के रक्कमही हातात पैसा येईल तसे देऊ, असे या शिष्टमंडळाने सांगितले. परंतु आयुक्त गायकवाड यांनी त्यास संमती दिली नाही. कायद्याने एफआरपी देणे बंधनकारकच आहे. त्यामुळे ती दिली नसेल तर साखर जप्तीची कारवाई आम्हाला करावीच लागेल. त्यामुळे पैसे देता येणार नसेल तर उर्वरित २० टक्के रकमेच्या किमतीची साखर शेतकºयांना द्यावी, असे त्यांनी सुचविले. त्यासाठी कारखान्यांनी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन शेतकºयांकडून अर्ज मागवावेत व साखरेचे वाटप करावे, असा पर्याय त्यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्ह्णातील कारखान्यांनी शेतकºयांना साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.हवी असेल तर साखर नाहीतर पैशांची प्रतीक्षासाखर वाटपाच्या प्रक्रियेची कारखान्यांकडून सुरुवात झाल्यास ज्या शेतकºयांना साखर हवी असेल ते घेऊन जातील. ज्यांना साखर नको असेल त्यांना कारखान्यांकडे पैसे उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागेल. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा रेटा कमी होण्यास मदत होईल. साखर द्या हा संघटनेनेच सुचविलेला पर्याय होता. त्याची अंमलबजावणी कारखान्यांकडून होत असेल व त्यातूनही एफआरपी पूर्णत: देता येत नसेल, तर कारखान्यांकडे बोट दाखविता येणार नाही.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा