शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कारखानदार २०% रकमेची साखर शेतकऱ्यांना देणार-साखर आयुक्तांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:38 IST

कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला.

ठळक मुद्देएफआरपी न दिल्यास कारवाई होणारच

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकºयांकडून अर्ज मागवून साखर वाटप करणार आहेत.

सध्या ऊसदराची विचित्र कोंडी झाली आहे. बाजारात साखरेला दर नाही म्हणून केंद्र शासनाने क्विंटलचा दर २९०० रुपये निश्चित करून दिला व त्याच्या जोडीला देशातून ५० लाख टन साखरेचा कोटा निर्यातीसाठी निश्चित करून दिला; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर १९०० च्या सुमारास आहेत. शिवाय विविध अनुदानापोटी टनास ८०० रुपये मिळतात. म्हणजे टनास २६०० रुपयांपर्यंत रक्कम मिळते. परंतु देशांतर्गत बाजारात २९०० रुपये दर असताना मी कशाला निर्यात करू अशी समजूत करून कारखानदार साख्नर तश्ीच ठेवून बसले आहेत. परिणामी, देशांतर्गत बाजारातील साखर हलायला व त्यामुळे दर वाढायलाही तयार नाही. त्याचा परिणाम म्हणून कारखान्यांना एकरकमी देण्यास अडचणी येत आहेत. त्याबद्दल साखर आयुक्तांनी साखर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यातून कसा मार्ग काढायचा यासाठी कारखान्यांचे शिष्टमंडळ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर संकुलमध्ये आयुक्त गायकवाड यांना भेटले. या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील यांच्यासह अन्य कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश होता.

कोल्हापूर जिल्ह्णातील कारखानदारीचा वेळेत बिले देण्याचा लौकिक आहे. आजपर्यंत एफआरपी तरी दिलीच आहे, त्याशिवाय अनेकदा त्याहून जास्त पैसे शेतकºयांना कारखान्यांनी दिलेले आहेत. यावर्षी आर्थिक अडचण असल्याने मधला मार्ग म्हणून आता ८० टक्के रक्कम आम्ही देत आहोत. उर्वरित २० टक्के रक्कमही हातात पैसा येईल तसे देऊ, असे या शिष्टमंडळाने सांगितले. परंतु आयुक्त गायकवाड यांनी त्यास संमती दिली नाही. कायद्याने एफआरपी देणे बंधनकारकच आहे. त्यामुळे ती दिली नसेल तर साखर जप्तीची कारवाई आम्हाला करावीच लागेल. त्यामुळे पैसे देता येणार नसेल तर उर्वरित २० टक्के रकमेच्या किमतीची साखर शेतकºयांना द्यावी, असे त्यांनी सुचविले. त्यासाठी कारखान्यांनी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन शेतकºयांकडून अर्ज मागवावेत व साखरेचे वाटप करावे, असा पर्याय त्यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्ह्णातील कारखान्यांनी शेतकºयांना साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.हवी असेल तर साखर नाहीतर पैशांची प्रतीक्षासाखर वाटपाच्या प्रक्रियेची कारखान्यांकडून सुरुवात झाल्यास ज्या शेतकºयांना साखर हवी असेल ते घेऊन जातील. ज्यांना साखर नको असेल त्यांना कारखान्यांकडे पैसे उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागेल. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा रेटा कमी होण्यास मदत होईल. साखर द्या हा संघटनेनेच सुचविलेला पर्याय होता. त्याची अंमलबजावणी कारखान्यांकडून होत असेल व त्यातूनही एफआरपी पूर्णत: देता येत नसेल, तर कारखान्यांकडे बोट दाखविता येणार नाही.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा