शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:02 IST

कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. यामुळे साखर कारखानदार चिंतेत आहेत. हे दर वाढण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पावले उचलली नाहीत, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यंदा उसाचे उत्पादन चांगले असल्याने देशात चालू हंगामात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. साखरेची मागणीही जवळपास २५० लाख टन आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा कमी म्हणजे २०३ लाख टन इतके झाले होते. परिणामी, गेल्यावर्षी साखरेचे घाऊक बाजारातील दर चार हजारांपर्यंत, तर किरकोळ बाजारातील दर प्रतिक्विंटल ४५०० रुपयांवर गेले होते. त्यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विविध उपाययोजना केल्या आणि साखरेची दरवाढ रोखली. हे दर सरासरी ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्यान राहतील आणि किरकोळ बाजारातील साखरेचे दर ४० ते ४२ रुपये किलो दरम्यान स्थिर राहतील, याची दक्षता घेतली होती.

साखरेचा शिल्लक साठा आणि चालू हंगामातील अपेक्षित उत्पादन लक्षात घेता यंदा साखरेचे दर आॅक्टोबरपासूनच घसरू लागले. ही घसरण ३५०० वरून २९५० रुपयांपर्यंत झाली आहे. ती १५ टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे कारखान्यांना एफआरपी अधिक २०० रुपये हा दर देणे अवघड बनले आहे. ही घसरण अशीच चालू राहिली, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यंदा गळीत हंगामाची सुरुवात शांततेत झाली होती. दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल स्थिर असल्याने कारखानदारांनी शेतकरी संघटनेचा आग्रह मान्य करून एफआरपी अधिक २०० रुपये अशी तडजोड केली होती. यातील एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल आणि पुढील १०० रुपये नंतर देण्याचे ठरले होते. यामुळे ऊस उत्पादकही खूश होते. दर स्थिर राहतील या अपक्षेने कारखानदारही बिनधास्त होते. मात्र, दरात घसरण सुरू होताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.सरकारने पावले उचलावीतसाखरेच दर वाढण्यासाठी केंद्र सरकारने दुहेरी किंमत धोरण, बफर स्टॉक, निर्यात अनुदानासह विविध पावले उचलावीत, अशी मागणी कारखानदार करीत आहेत. 

गेल्या वर्षी साखरेचे किरकोळ बाजारातील दर ४० ते ४२ रुपयांच्या वर जाऊ नयेत, यासाठी केंद्राने उपाययोजना करून घाऊक बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी उपाय योजले होते. तशीच उपाययोजना आता दर घसरू नयेत, यासाठीही सरकारने केले पाहिजेत. अन्यथा, साखर कारखानदारीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ.

टॅग्स :MONEYपैसाkolhapurकोल्हापूर