शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांची न्यायालयात धाव

By admin | Updated: October 5, 2016 00:38 IST

साखरसाठ्यावरील निर्बंधाला विरोध : राज्य साखर संघाची याचिका दाखल; शुक्रवारी होणार सुनावणी

प्रकाश पाटील -- कोपार्डे -देशातील साखर कारखान्यांनी हंगाम २०१५-१६ मध्ये उत्पादित साखरेपैकी सप्टेंबर महिन्यात ३७ टक्के व आॅक्टोबर महिन्यात २४ टक्के साखर शिल्लक ठेवण्याचा केंद्राने आदेश काढला. यामुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर संघाच्यावतीने केंद्राच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्याची सुनावणी ७ आॅक्टोबरला होणार आहे.२०१५-१६ हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर कमी झाले. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर साखरेला मिळू लागल्याने साखर कारखानदार आर्थिक अडचणीत आले. हा हंगाम सुरू करण्यास कारखानदार टाळाटाळ करू लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी कृषिमंत्री शरद पवार व कारखानदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी देशातील साखरेचा साठा कमी होऊन साखरेचे दर वाढावेत, यासाठी साखर निर्यातीचे धोरण स्वीकारले. ४० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे जाहीर करून प्रत्येक कारखान्याने मागील हंगामात उत्पादित केलेल्या साखरेच्या ११ टक्के साखर निर्यातीचे बंधन घातले. जे कारखाने याप्रमाणे साखर निर्यात करतील, अशा कारखान्यांनाच गाळप केलेल्या उसावर प्रतिटन थेट शेकऱ्यांच्या खात्यावर ४५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. यामुळे कारखानदारांनी अनुदान मिळविण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी २५०० रुपये प्रतिक्विंटल साखर निर्यात केली.याचा परिणाम साखरेचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. जानेवारी २०१६ नंतर हे वाढणारे दर मे व जून २०१६ पर्यंत ३५०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल पोहोचले. त्यातच पुढील हंगाम २०१६-१७ मध्ये उसाचे उत्पादन घटल्याने साखर उत्पादन घटणार असल्याने साखरेचे दर वाढून ते ४००० ते ४२०० रुपयांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे साखरेचे हे दर वाढतच राहणार असून, शासनाने निर्यात बंदी आणली. निर्यातीवर पुन्हा २० टक्के कर लावण्यात आला; तरीही साखरेचे दर वाढतच राहिल्याने केंद्र शासनाने ८ सप्टेंबर २०१६ ला आदेश काढून कारखानदारांवरही साखरसाठा सप्टेंबर महिन्यात ३७ टक्के, तर आॅक्टोबरमध्ये २४ टक्के राखण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कारखान्याच्या साखर कोठ्याची माहिती घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील प्रत्येक कारखान्याकडे असणाऱ्या साखरसाठ्याची माहिती संकलित केली असून, २३ कारखान्यांपैकी १५ कारखान्यांकडे ४० टक्केपेक्षा जादा साखरसाठा सप्टेंबर महिन्यात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कारखानदारांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले असून, शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने कारवाई थांबणार? केंद्राने साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला आहे. शुगर (कंट्रोल) आॅर्डर १९६६च्या कलम १५ नुसार जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ (१०चा १९५५) च्या कलम ५चा आधार घेऊन राज्य शासनाला या साखरसाठ्याबाबत आदेश काढले असले तरी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने कारवाई करणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.केंद्र शासनाने ४५ रुपये अनुदानाचा आपला निर्णय बासणात गुंडाळला आहे. मागील दोन वर्षांचे तोटे भरून निघण्याची शक्यता या साखर दरवाढीने निर्माण झाली होती; पण शासनाच्या साखर उद्योगाच्या बाबतीत असणाऱ्या धरसोड वृत्तीने नेहमी अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. यामुळे कारखानेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळणे अवघड होणार आहे.- चंद्रदीप नरके, सदस्य राज्य साखर संघ, अध्यक्ष कुंभी-कासारी.