शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सावकारांवर गुन्हे दाखल करून मोक्का लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 19:24 IST

जिल्ह्यात छुप्या आणि उघड मार्गाने सावकारकी करणाऱ्यांना ठोका, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून, त्यांचा बीमोड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले; त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सावकारांचे आता १२ वाजणार आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशक्राइम बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : खासगी सावकारकीतून अनेक गोरगरीब कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर प्रकारही सावकारकीच्या माध्यमातून होत आहेत. सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकजण आत्महत्या करीत आहेत. जिल्ह्यात सावकारकीचे पेव वाढत आहे. जिल्ह्यात छुप्या आणि उघड मार्गाने सावकारकी करणाऱ्यांना ठोका, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून, त्यांचा बीमोड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले; त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सावकारांचे आता १२ वाजणार आहेत.पोलीस मुख्यालयात मंगळवारी क्राइम बैठक आयोजित केली होती. यावेळी अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये खासगी सावकारांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले; परंतु अद्यापही पूर्णत: या व्यवसायाचा बिमोड करता आलेला नाही; त्यामुळे गल्ली-बोळांत सावकारांचे पेव फुटले आहे.

कर्जाच्या व्याजापोटी सावकार टोकाची भूमिका घेऊ लागले आहेत. त्यातून अनेक सर्वसामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्यामुळे गुंडगिरी आणि अवैध व्यवसायांना बळ मिळत आहे. खासगी सावकारांविरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर थेट मोक्काचा गुन्हा दाखल करा, पोलिसी खाक्या दाखवून त्यांची सावकारकी उतरवा.

जिल्ह्यातून पूर्णपणे खासगी सावकारकी हद्दपार झाली पाहिजे; त्यासाठी कठोर पावले उचला, असे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीमुळे गुन्हे उघडकीस आणण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रलंबित गुन्हे तत्काळ मार्गी लावा. जिल्ह्यात घरफोडी, लूटमारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. विशेषत: करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढते प्रकार आहेत.

हे गुन्हे रोखण्यासाठी विशेष लक्ष द्या. जिल्ह्यात आणखी काही गँगवार टोळ्या आहेत. त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव पाठवा, असे आदेश दिले. यावेळी महिन्याभरात चांगले काम करणाºया पोलीस ठाणे व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, करवीरचे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.शांततेचे आवाहनरामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यावर सर्वोच्च न्यायालय कोणत्याही क्षणी निकाल देण्याची शक्यता आहे. हा निर्णय कोणत्या धर्माविरूद्ध, राजकीय पक्षाचा विजय नाही. तो न्यायिक निर्णय आहे, तो सर्वांनी मान्य करून शांतता राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, मशीद, प्रार्थना स्थळे, बसस्थानके, मोहल्ले, आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नाकाबंदीसह वाहनांच्या तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.निर्भयपणे तक्रार द्याजिल्ह्यात खासगी सावकारकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. या सावकारांकडून गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या अवैध प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करून सावकारांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेले भय संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी तक्रार देताच सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना खाकीचा दंडुका पडेल; त्यासाठी कसलीही भीती न घेता नागरिकांनो तक्रार द्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर