शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:36 IST

खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं.

विक्रम पाटील

एकीकडे फसव्या योजनांच्या नावावर आँनलाईन गंडा घालून लाखो रूपयांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या आपण नियमीत वाचत असतो. परंतु पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील विजय शिवाजी पाटील या युवकाने तामिळनाडू येथून त्यांच्या खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं.

विजय यांचे बी.टेक पर्यंत शिक्षण झाले असून ते पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या मोबाईल नंबरवर तामिळनाडू येथील जयचंद्र नावाच्या मोबाईल नंबरवरून ५० हजाराची रक्कम शनिवारी सायंकाळी जमा झाली. सिंधुदूर्ग सावंतवाडी येथे जयचंद्र यांचे नातेवाईक राहतात. मोबाईल नंबरच्या शेवटच्या अंकातील एका चुकीमुळे नातेवाईकांना पाठवायचे पैसे विजय यांच्या खात्यावर जमा झाल्याने हा प्रकार घडला.

विजय यांचा सदरचा नंबर बंद लागत नसल्याने जयचंद्र यांची रात्रभर घालमेल झाली. मात्र रविवारी सकाळी उठून प्रामाणिकपणे विजय यांनी जयचंद्र यांना संपर्क केल्यानंतर जयचंद्र यांनी भावनिक होत पाच हजार बक्षिस म्हणून आपल्याकडे ठेऊन घ्यावे व उर्वरित रक्कम परत पाठवण्याची विजय यांना विनवणी केली. यावेळी विजय यांनी सावंतवाडी येथील त्यांच्या नातेवाईकांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून खात्री करून घेतली व आपल्याला कोणत्याही प्रकारचे बक्षिस नको म्हणत खात्यावर आलेली ५० हजारांची रक्कम जशीच्यातशी परत पाठवून प्रामाणिकपणा अजून जीवंत असल्याचे दाखवून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर