शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानात ८०० कोटी रुपयांची कपात

By admin | Updated: March 3, 2015 22:43 IST

शटललेस उद्योजकांचे धाबे दणाणले : साध्या यंत्रमागाचे रॅपियरमध्ये रूपांतरण करण्याकडे दुर्लक्ष

इचलकरंजी : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाच्या अनुदानामध्ये ८०० कोटी रुपयांची कपात करण्यात आली असल्याने नव्याने शटललेस माग स्थापित करणाऱ्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. याशिवाय छोट्या यंत्रमागधारकांसाठी साध्या यंत्रमागाचे रॅपियर पद्धतीने आधुनिकीकरण करणाऱ्या अनुदान योजनेकडेही दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.वस्त्रोद्योगात आधुनिक तंत्र यावे आणि निर्यातीत दर्जाचे कापड उत्पादन होऊन परकीय चलन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने तांत्रिक उन्नयन निधी योजना चालू केली. गेल्या दहा वर्षामध्ये वस्त्रोद्योगामधील अनेक घटकांनी याचा लाभ घेतला. ज्यामुळे देशातील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. मागील वर्षी मात्र तांत्रिक उन्नयन निधी योजनेंतर्गत नवीन उद्योगाची अचानकपणे नोंदणी बंद झाली. कारण केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेंतर्गत तरतूद करण्यात आलेला निधी डिसेंबर महिन्यात संपला आणि जानेवारी महिन्यापासून ही नोंदणी ठप्प झाली.मात्र, योजना बंद झाली नसल्याने त्यानंतरही अनेक उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञानाची यंत्रसामग्री आयात केली आणि त्याचे प्रस्ताव केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तांकडे सादर केले. सध्या इचलकरंजी परिसरातील सुमारे १२५ प्रस्ताव प्रलंबित असून, अशा उद्योजकांना ३५ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. अशा पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वस्त्रोद्योगाच्या अनुदानामध्ये ८०० कोटी रुपयांची कपात करण्यात आल्याने तांत्रिक उन्नयन निधी योजनेंतर्गत प्रस्ताव करणाऱ्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहे.केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सन २०१३-१४ ला वस्त्रोद्योगासाठी ३१३१ कोटी, सन २०१४-१५ ला ४३२६ कोटी, तर २०१५-१६ ला ३५१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे गतवर्षीपेक्षा नवीन अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी ८०३ कोटी रुपये कमी तरतूद केली आहे. त्याचबरोबर गतवर्षी तांत्रिक उन्नयन निधी योजनेसाठी १९०० कोटी रुपये तरतूद होती. ती आता १५२० कोटी रुपये इतकी झाली आहे. (प्रतिनिधी)वस्त्रोद्योगाला वाटाण्याच्या अक्षतानवीन अर्थसंकल्पाबाबत बोलताना इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी म्हणाले, नवीन अर्थसंकल्पात यंत्रमागधारकांसाठी आवश्यक असलेले व्याज अनुदान, तांत्रिक उन्नयन निधी योजना आणि साध्या यंत्रमागाचे रॅपियर पद्धतीमध्ये रूपांतर करण्याच्या अनुदान योजनेकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यायाने केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.