शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचा विषय हवा : श्रीपाल ओसवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:25 IST

देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये

ठळक मुद्देरस्ते अपघात रोखण्यासाठी गांभीर्याने पाहण्याची गरज

इचलकरंजी : देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण अपघातात ठार होतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, सर्वांनीच स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांबाबतचा विषय आवश्यक आहे, असे मत श्रीपाल ओसवाल (कºहाड) यांनी व्यक्त केले.

येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित वाहतुकीचे नियम व चालकांच्या चुकामुळे होणारे अपघात याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ओसवाल यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आकडेवारीसह स्पष्ट केले. त्यामध्ये देशातील होणाºया अपघातात पादचारी, सायकलस्वार व मोटारसायकलस्वार यांच्या मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे, तर कार व इतर अपघातात मृत्यूंचे प्रमाण १७ टक्के आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याने डोके फुटून झालेले अपघात ८५ टक्के आहे. तसेच कार अपघातातील बहुतांशी मृत्यू सिटबेल्ट न लावल्याने झाल्याचे आढळते.

देशात विविध आजाराने होणाºया मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अपघातात ठार होणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून वाहतुकीचे नियम पाळणे, तसेच शिस्तबद्धता आल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अनेक देशांमध्ये वाहतुकीविषयीचे नियम व कायदे कडक आहेत. तसेच त्याचे तेथील नागरिकांकडून काटेकोरपणे पालनही केले जाते. आपणही जागरूकपणा आणल्यास हे प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असेही ओसवाल यांनी स्पष्ट केले.

रोटरीचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी स्वागत व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, रोटरीचे पदाधिकारी, टेम्पोचालक, बसचालक, रिक्षाचालक, स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक, आदींच्या चालकांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सागर पाटील व सत्यनारायण धूत यांनी सूत्रसंचालन केले. संजय घायतिडक यांनी आभार मानले.इचलकरंजी येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत रस्ते सुरक्षा याविषयी श्रीपाल ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस