शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचा विषय हवा : श्रीपाल ओसवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:25 IST

देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये

ठळक मुद्देरस्ते अपघात रोखण्यासाठी गांभीर्याने पाहण्याची गरज

इचलकरंजी : देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण अपघातात ठार होतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, सर्वांनीच स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांबाबतचा विषय आवश्यक आहे, असे मत श्रीपाल ओसवाल (कºहाड) यांनी व्यक्त केले.

येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित वाहतुकीचे नियम व चालकांच्या चुकामुळे होणारे अपघात याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ओसवाल यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आकडेवारीसह स्पष्ट केले. त्यामध्ये देशातील होणाºया अपघातात पादचारी, सायकलस्वार व मोटारसायकलस्वार यांच्या मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे, तर कार व इतर अपघातात मृत्यूंचे प्रमाण १७ टक्के आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याने डोके फुटून झालेले अपघात ८५ टक्के आहे. तसेच कार अपघातातील बहुतांशी मृत्यू सिटबेल्ट न लावल्याने झाल्याचे आढळते.

देशात विविध आजाराने होणाºया मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अपघातात ठार होणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून वाहतुकीचे नियम पाळणे, तसेच शिस्तबद्धता आल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अनेक देशांमध्ये वाहतुकीविषयीचे नियम व कायदे कडक आहेत. तसेच त्याचे तेथील नागरिकांकडून काटेकोरपणे पालनही केले जाते. आपणही जागरूकपणा आणल्यास हे प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असेही ओसवाल यांनी स्पष्ट केले.

रोटरीचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी स्वागत व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, रोटरीचे पदाधिकारी, टेम्पोचालक, बसचालक, रिक्षाचालक, स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक, आदींच्या चालकांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सागर पाटील व सत्यनारायण धूत यांनी सूत्रसंचालन केले. संजय घायतिडक यांनी आभार मानले.इचलकरंजी येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत रस्ते सुरक्षा याविषयी श्रीपाल ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस