शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
8
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
10
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
17
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
18
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
19
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या फेरमूल्यांकनासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:06 IST

तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत. या निकालाचे फेरमूल्यांकन करावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठात बुधवारी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलसचिव डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.

ठळक मुद्देनिकालाच्या फेरमूल्यांकनासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या कुलसचिवांना निवेदन : विधि अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना फटका

कोल्हापूर : तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत. या निकालाचे फेरमूल्यांकन करावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठात बुधवारी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलसचिव डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विधि महाविद्यालयांतील संबंधित अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हे या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या. कोरोनामुळे एप्रिल-मेमधील सत्रांच्या परीक्षा न घेता विद्यापीठाने निकाल घोषित केले आहेत.

या निकालासाठी जे निकष लावले गेले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य शासन आणि विद्यापीठाच्या दि. ८ मे रोजीचे परिपत्रक आणि दि. १५ मे रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि ५० टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे सरासरी गुण असे मूल्यांकन होणार होते.

परंतु, विद्यापीठाच्या २९ मे रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार ५०-५० टक्के मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे शंभर गुणांचा पॅटर्न असणारे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकालाचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर