शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शिंगणापूर येथे विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

कोपार्डे : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रांबरोबर खाणीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. यशराज राजू माळी(वय१६, रा. ...

कोपार्डे : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रांबरोबर खाणीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. यशराज राजू माळी(वय१६, रा. गणेशनगर, शिंगणापूर, ता. करवीर) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

अधिक माहिती अशी, यशराज आपल्या मित्रांसोबत सकाळपासून रंगपंचमी खेळत होता. प्रचंड उष्णता असल्याने दुपारी १२ नंतर मित्रांसोबत तो शिंगणापूर-चंबूखडी येथे मसोबाच्या मागच्या खाणीत आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते याची मित्रांनाही कल्पना नव्हती. काही मित्रांनी काठावरून पाण्यात उडी मारल्याने यशराज व मारुती कस्तुरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या. या दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे अभिषेक खेतल या मित्राच्या लक्षात आले. त्याने पाण्यात उडी घेऊन मारुती कस्तुरे याला बाहेर काढले. पुन्हा पाण्यात उडी घेऊन यशराजला शोधण्याचा प्रयत्न अभिषेकने केला पण तो सापडला नाही. खाणीत असलेल्या गाळात तो अडकल्याने यशराजला पाण्यावरती येता आले नाही. यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

यशराज हा दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या वडील दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. यशराजची आई योगिता या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाडा चालवत होत्या. यशराज हा एकुलता मुलगा होता. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातील असणारे माळी कुटुंब रोजगारानिमित्ताने शिंगणापूर येथे स्थायिक झाले आहे. यशराजचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्याची आई ,बहिणी, मामा, मामी यांनी ह्रदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला.

फोटो १)यशराज माळी २)जेथे यशराजचा बुडून मृत्यू झाला तेथे जमलेली मोठी गर्दी