शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

‘संघर्ष’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी

By admin | Updated: September 7, 2015 00:52 IST

‘युवा शक्ती’तर्फे आयोजन : गडहिंग्लजकरांनी सात थर लावत दुसऱ्यांदा पटकावले बक्षीस; सव्वातीन तास थरार

कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)१०० ट्रक चारा देणार : महाडिकराज्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून पाणी, चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यापूर्वीही दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीवेळी वेळी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले आहे. तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाची झळ कमी आहे. त्यामुळे अन्य दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक चारा संकलित करून पाठविणार आहे. खासदार म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. अनेक प्रश्नांची तड लावली आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. बालगोविंदांसाठी विशेष दक्षतादहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात बालगोविंदा जखमी होऊ नयेत, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली होती. सर्वांत उंचावर असलेल्या एका बालगोविंदाला विशेष रोप लावण्यात येत होता. ही सुविधा हिलरायडर्स ग्रुपने पुरविली. मानवी मनोरा रचताना पडून जखमी झालेल्या चार गोविंदांना सीपीआर व सिद्धगिरी रुग्णालयांतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.