शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोल्हापुरात कडकडीत बंद, महापालिका, पोलीस प्रशासनाची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:19 IST

CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळपासून दुपारपर्यंत असणारी गर्दी गुरुवारी महापालिका कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिसांनी रोखली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर कडकडीत बंद झाले. भाजी मंडई, शहरातील दुकाने, सर्व रस्ते ओस पडले. वारंवार सांगून, सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका व पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली.

ठळक मुद्देकोल्हापुरात कडकडीत बंद महापालिका, पोलीस प्रशासनाची आक्रमक भूमिका

कोल्हापूर : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळपासून दुपारपर्यंत असणारी गर्दी गुरुवारी महापालिका कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिसांनी रोखली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर कडकडीत बंद झाले. भाजी मंडई, शहरातील दुकाने, सर्व रस्ते ओस पडले. वारंवार सांगून, सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका व पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली.कोल्हापूर जिल्ह्यात दि. १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. सकाळी सात ते अकरा यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवा, औषध दुकाने, पेट्रोल पंप सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. ३० एप्रिलपासून दि. १३ मे पर्यंत संचारबंदी पुन्हा वाढविण्यात आली. परंतु, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली शहरात दुपारपर्यंत सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने तसेच वाहनांनी भरलेले असायचे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना दिल्या, परंतु नागरिक काही केल्या ऐकत नव्हते.महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात आढावा घेतला आणि गुरुवारपासून शहरातील सर्वच भाजी मंडई बंद करण्याचा तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना घरपोहोच सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यापासून सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळी सात वाजताच शहराच्या विविध भागात रस्त्यावर उतरले.अधिकाऱ्यांनी मज्जाव केल्यामुळे कोणाही भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरू करता आला नाही. फेरीवालेसुद्धा गायब झाले. शाहुपूरी पाच बंगला येथील भाजी मंडई तर बॅरिकेड लावून बंद केली होती. कपिलतीर्थ, राजारामपुरी, गंगावेश, पंचगंगा घाट येथील भाजी मंडईतही मनपाचे कर्मचारी, पोलीस थांबून होते.पालिका, पोलीस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील कोणतीही दुकाने गुरुवारी उघडली नाहीत. फक्त औषधांची दुकाने, पेट्रोल पंप सुरू होते. तुरळक सुरू असणारी रिक्षा वाहतूकही बंद झाली. शहराच्या अनेक चौकांत त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक नागरिकाला दुचाकीवरून जाताना अडविले जात होते. योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्यांवर गाड्या जप्तीची कारवाई केली जात होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजताच शहरात कडकडीत बंद सुरू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर