शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 07:24 IST

कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर हालचाली रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढू लागल्याने विचार

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाची आणि त्यास बळी पडलेल्याची संख्या प्रचंड वाढू लागल्याने या दोन जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.त्यास अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला.

आज केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रविवारी १२६० नवे रुग्ण सापडले असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती स्फोटक बनली आहे. रुग्ण संख्या प्रचंड वाढू लागल्याने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, वेळेवर उपचार होत नाहीत त्यामुळे मृत्यू होऊ लागले आहेत.

खासगी दवाखान्यात उपचारासाठी बेड उपलब्ध होणे यासाठीच रुग्णांच्या नातेवाईकांना दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे किमान १० दिवसाचा लॉकडाऊन परत कडक करून संसर्गाची साखळी कशी तोडता येईल असा विचार मुख्यतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर सुरू झाला आहे.

या दोन जिल्ह्यातील गंभीर स्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानांवर घालून पुरेशी साधने उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता.त्यांच्याकडून लॉकडाऊन कडक करण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. शेट्टी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

एका बाजूला केंद्र सरकारकडून सगळेच निर्बंध उद्या मंगळवारपासून (दि १ सप्टेंबर) उठवण्यात येत आहेत. ई पासही रद्द करा असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे आणि राज्य शासन लॉकडाऊन कडक करणार असेल तर त्याबद्धल लोकांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून लॉकडाऊन कडक करण्याबाबतचे संकेत मिळाले आहेत. आज सोमवारी याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय आम्ही घेऊसतेजपाटीलपालकमंत्री कोल्हापूर

असाहीएकमतप्रवाह

सध्या जे निर्बन्ध आहेत ते तसेच चालू ठेवून सायंकाळी ७ वाजल्यांतरचे व्यवहार शंभर टक्के बंद केले जावेत..म्हणजे सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करावा असाही एक मतप्रवाह आहे.

माजी खासदार शेट्टी यांनीही लॉकडाऊन कडक करण्यापेक्षा उपचाराच्या सुविधा जास्तीतजास्त कशा निर्माण करता येतील त्यावर भर द्यावा असे वाटते..लॉकडाऊन मुळे हातावरील पोट असलेल्या मोठया वर्गाची उपासमार होते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSangliसांगली