शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:14 IST

जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिराशिवाजी विद्यापीठातील संगवे स्मृती व्याख्यान

कोल्हापूर : जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा. डॉ. उत्तमराव भोईटे होते. प्रा. इंदिरा यांच्या व्याख्यानाचा विषय ‘भारतातील गरिबी, सामाजिक असमानता आणि अन्याय’ असा होता.

प्रा. इंदिरा म्हणाल्या, जागतिकीकरणाच्या घुसळणीत होणारी फरफट, तंत्रज्ञानामुळे आलेल्या भौतिक सुविधांमागे धावण्याची प्रवृत्ती आणि यासाठी राबविण्यात येणारी धोरणे यांमुळे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत गेले. जागतिकीकरणामुळे समाजाचा मानवी चेहराच हरवला आहे. या प्रक्रियेत श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत, तर गरीब खोल गर्तेत ढकलला जात आहे. मानवी समाजाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे.या कार्यक्रमास माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पवार, आर. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर