शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:14 IST

जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिराशिवाजी विद्यापीठातील संगवे स्मृती व्याख्यान

कोल्हापूर : जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा. डॉ. उत्तमराव भोईटे होते. प्रा. इंदिरा यांच्या व्याख्यानाचा विषय ‘भारतातील गरिबी, सामाजिक असमानता आणि अन्याय’ असा होता.

प्रा. इंदिरा म्हणाल्या, जागतिकीकरणाच्या घुसळणीत होणारी फरफट, तंत्रज्ञानामुळे आलेल्या भौतिक सुविधांमागे धावण्याची प्रवृत्ती आणि यासाठी राबविण्यात येणारी धोरणे यांमुळे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत गेले. जागतिकीकरणामुळे समाजाचा मानवी चेहराच हरवला आहे. या प्रक्रियेत श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत, तर गरीब खोल गर्तेत ढकलला जात आहे. मानवी समाजाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे.या कार्यक्रमास माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पवार, आर. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर