शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

नामदेव ढसाळांचे लेखन माणूसकेंद्री : चव्हाण

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

दर्पण सांस्कृतिक मंच : ढसाळ व्यक्ती, चळवळ, साहित्यावर चर्चासत्र

कणकवली : साहित्यिक तळातल्या वर्गाचे सखोल लेखन करतो तेव्हा तो व्यक्तीकडून समिष्टीकडेच जात असतो. नामदेव ढसाळ यांनी आपल्या सर्व प्रकारच्या लेखनातून एकूण समाजाचाच विचार केला. त्यामुळेच ढसाळांनी जात-धर्माच्या पलिकडे माणूसकेंद्री लेखन केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि विख्यात लेखक प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण यांनी केले.दर्पण सांस्कृतिक मंच आणि प्रबुद्ध ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित नामदेव ढसाळ व्यक्ती, चळवळ आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या चर्चासत्रात ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. डॉ. महेंद्र भोवरे, चित्रपट लेखक कादंबरीकार प्रा. डॉ. अनिल सपकाळ, समीक्षक प्रा. डॉ. संजय मून, कवी प्रा. डॉ. उत्तम अभोरे आदी सहभागी झाले होते. उद्घाटनसत्राला कवी अजय कांडर, कवी उत्तम पवार यांच्यासह दर्पणचे अध्यक्ष राजेश कदम, सचिव सुनिल तांबे, महेंद्र कदम, प्रकाश कदम, सिद्धार्थ तांबे उपस्थित होते.ते म्हणाले, नामदेव ढसाळ हे कवी, कादंबरीकार, राजकीय नेते अशा विविधांगी रुपाने ते महाराष्ट्राला ओळखीचे असले तरी त्यांची खरी ओळखही कवी म्हणूनच आहे. ढसाळांना कवितेपासून विलग करता येणार नाही. पण त्यांनी एकूणच कार्यकर्ता, लेखक आणि अभ्यासक म्हणून केलेले काम महाराष्ट्राच्या पुरोगामीचा चेहरा पुढे घेऊन जाणारेच आहे. नामदेव ढसाळ यांनी अशी कविता लिहिली की, त्यांची मराठी कवी अशी ओळख निर्माण झाली नव्हती तर भारतीय पातळीवरचा एक अशी त्यांची ओळख झाली होती. हा त्यांचाच फक्त सन्मान नव्हता, तर तो मराठी कवितेचाही सन्मान होता. ढसाळांचे लेखन पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार आहे.‘ढसाळ व्यक्ती आणि कविता’ या विषयावर बोलताना प्रा. भोवरे म्हणाले की, ढसाळ यांचा खरा चेहरा म्हणजे कविताच. ‘मी सत्याच्या कानाशी लाथ मारणारा’ या त्यांच्या ओळी त्यांच्या जगण्याला तंतोतंत जुळतात. वेगळ्या सौंदर्यशास्त्राची निर्मिती करणारी त्यांची कविता आहे. त्यांनी सामान्य माणसाचे बोट धरून चालणारी कविता लिहिली. ढसाळांच्या कवितेने माणसाच्या सामर्थ्यांचा विचार मांडला. वर्ण, शोषक व्यवस्थेच्या विरोधात स्फोटक कविता लिहिली. फुलांच्या सुगंधापेक्षा चांगला असतो माणसाच्या चारित्र्याचा वाद’ हा मौलिक विचार त्यांच्या कवितेने दिला. ढसाळांची कविता राजकीय भूमिका घेत भांडवलदारांच्या विरोधात आवाज उठविते.‘ढसाळ यांची कादंबरी’ या विषयावर प्रा. डॉ. सपकाळ म्हणाले, ढसाळ यांचे कादंबरी लेखन विकसित होत जाणारे आहे. ते कादंबरीतून कथक शैलीतून व्यक्त होतात. त्यातून ते बांधिलकी मानणारा कार्यकर्ता म्हणून शोधता येते. सर्वसामान्य माणसाचा शोध घेणारा लेखक म्हणूनही ढसाळ कादंबरीतून दिसतात. संबंधांचे राजकारणही त्यात दिसते. ढसाळांच्या कादंबरीतून स्त्रियांचं राजकारण, दु:ख अतिशय तीव्रपणे मांडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)उत्तम पवार म्हणाले, जुन्या पिढीचा वारसा नव्या पिढीने सांभाळायला हवा. त्यातूनच नामदेव ढसाळांच्या साहित्यावर चर्चासत्र आयोजित करून त्यांना त्यांचे स्मरण होत राहिले पाहिजे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या मान्यवर साहित्याच्या सहभागातून ढसाळ व्यक्ती, चळवळ आणि साहित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे जबाबदारीचे भान जपत दर्पणने २५ वर्षात वैचारिक उपक्रमांनी परिवर्तन चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.