शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

वादळ शमले... आता कार्यकर्त्यांकडून शेट्टींची मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 11:54 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवादळ शमले... आता कार्यकर्त्यांकडून शेट्टींची मनधरणीस्वाभिमानीतील वाद : प्रदेशाध्यक्षांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शेट्टी यांनीच आमदार व्हावे, अशी राज्यभर मोहीम सुरू झाली असून कार्यकर्त्यांकडून शेट्टी यांच्या मनधरणीसाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत.शेट्टी यांचे सर्वाधिक विश्वासू आणि जवळचे सहकारी असलेले प्रा. पाटील व मादनाईक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेण्यावरून नाराजी व्यक्त करताना आपला उमेदवारीसाठी का विचार झाला नाही, अशी खंत व्यक्त केली होती.यावरून शेतकरी संघटनेतील कलह राज्यभर पोहोचला होता. संघटना पुन्हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील व मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेऊन शेट्टी यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे; पण आता शेट्टी यांनीच उमेदवारी स्वीकारावी यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर आज, शनिवारी शेतातच आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावली आहे.आता लक्ष शेट्टींच्या भूमिकेकडेआपल्यालाच का उमेदवारी स्वीकारावी लागली याचा खुलासा फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदारकी नको अशी भूमिका घेत यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. उमेदवारीवरून संघटनेत वाद नकोत म्हणून पाटील व मादनाईक यांनी नमते घेतले तरी शेट्टी यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.समाजमाध्यमांवर शेट्टींचेच वारेसंघटनेतूनच विरोध झाल्याने व्यथित झालेले शेट्टी यांनी ह्यआमदारकीची ब्याद नको,ह्ण असे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. समाजमाध्यमांवर शेट्टी समर्थकांचेच वारे वाहू लागले असून, आमदारकी स्वीकारा नाही तर पदांचे सामूहिक राजीनामे देऊ, घरासमोर येऊन उपोषणाला बसू असे आर्जवही केले जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेट्टी सभागृहात हवेत, असे समर्थन करतानाच एक गट्टी - राजू शेट्टी असा नाराही पुन्हा एकदा घुमू लागला आहे. राज्यभरात कार्यकर्त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून आमदारकी स्वीकारावी यासाठी जोरदार आग्रह धरला जात आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर