शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंद, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; सरवडे पट्ट्यातील गावे हादरली

By विश्वास पाटील | Updated: November 29, 2022 12:01 IST

...यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कोल्हापूर: जीवनावश्यक दैनंदिन किराणा माल तसेच किरकोळपासून मोठ्यात मोठ्या आजारांसाठी लागणारी औषधे स्वस्तात देण्याचा आणि केलेल्या गुंतवणूकीचा आकर्षक परतावा देण्याचा भुलभुलैय्या करणाऱ्या एका स्टोअर कंपनीचा हत्ती आता चिखलात रुतला आहे. यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कमी गुंतवणीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरवातीला बक्कळ पैसा मिळवायचा आणि मग अचानक गाशा गुंडाळून परागंदा व्हायचे हाच फॉर्मुला वापरून साधारणतः चार-पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या स्टोअर या कंपनीचाही प्रवास आता याच मार्गाने सुरु झाला आहे. कंपनीचे मालक या महिन्याअखेर कंपनी नव्या जोमाने सुरु होणार असल्याचा व मिळालेला परतावा वजा करून राहिलेली रक्कम देणार असल्याचा विश्र्वास देत आहेत परंतू प्रत्यक्षात तसे कांही घडताना दिसत नाही. अन्य कंपन्यानुसारच ज्यांनी सुुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले आहेत. परतावा तरी मिळत होताच शिवाय दुकाने सुरु झाल्याने तिथे स्वस्तात माल मिळत असल्याने लोकांचा जास्त विश्र्वास बसला. कारण फायदा थेटच अनुभवताच येत होता. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतापर्यंत किराणा माल कमी दरात मिळावा ही सर्वांचीच हाव असते. वाढत्या आजारांच्या फैलावामुळे औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची चिंता सर्वांनाच सतावते. अन्न आणि औषधे स्वस्तात देण्याचा फंडा ओळखून या कंपनीने गोवामार्गे राज्यात पाऊल टाकले. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा तोंडातोंडी प्रसार झाल्याने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.

नवीन गुंतवणूकदार जमा करणाऱ्यांना आकर्षक कमिशन होते त्यामुळे गावागावात एजंट तयार झाले. साखळी पद्धतीने वाढणारी ही योजना वर्षभरात घराघरांत पोहचली. शेतकऱ्यांपासून ते पुढाऱ्यांपर्यंत आणि शिपायांपासून ते डॉक्टर, वकिलांपर्यंत नऊ हजार ते पाच लाख रुपयांची सरासरी गुंतवणूक केल्याचे दिसते.

 असा होता गुंतवणूकीचा फॉर्मुला... -कंपनीने केलेल्या योजनेनुसार ९ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत यात गुंतवणूक करण्याची मुभा होती. नऊ हजारांच्या गुंतवणूकीसाठी प्रतिमहिना ८२५ रुपये परतावा ३६  महिने दिला जात होता..याच पटीत केलेल्या गुंतवणूकीसाठी परतावा मिळत होता. किराणा माल खरेदी करताना नऊ हजाराच्या गुंतवणूकीवर वार्षिक २२०० रुपयांचे भेट कूपन मिळणार होते. तेवढ्या रक्कमेवर ३३ टक्के सूट दिली जात असे. किराणाशिवाय औषधे खरेदी करणाऱ्यांसाठीही अशीच सवलत होती.

डोक्यावर पावशेर तेल.. - दिवाळीत या स्टोअर्समधून २८०० रुपयांचा खाद्य तेलाचा कॅन २२०० रुपयांना मिळत होता. त्यामुळे लोकांची हे कॅन न्यायला झुंबड उडत असे. त्यावेळी स्वस्तात मिळतात म्हणून तेलाचे कॅन पळवणारे आता परतावे मिळत नाहीत म्हणून झोपताना डोक्यावर पावशेर तेल घालून शांतता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या पट्ट्ट्यात गावेच्या गावे -या स्टोअर्समध्ये मुख्यत: आकनूर, सरवडे,नरतवडे, कासारवाडा, गारगोटीमध्ये जास्त गुंतवणूक झाली. त्यातही गुंतवणूक करणारा मुख्यत: प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रमाण जास्त होते.

व्यवहार झाले ठप्प.. -मुदाळतिठ्ठा, बिद्री, कूर, गारगोटी आणि कोल्हापूरातही तीन-चार ठिकाणी स्टोअर्स सुरु झाले होते. सरवडे येथे बिल्डींग घेतली. माल ठेवण्यासाठी रॅकही घेतले परंतू स्टोअर्स सुरु झाले नाही. या स्टोअर्सना प्रत्यक्षात कुलुपे लागलेली नसली तरी जूनपासून तेथील विक्री पुरती थंडावली आहे. गुळाचे रवे व तत्सम स्वरुपाचे न खपलेले साहित्य आता या स्टोअर्समध्ये पडून आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय