शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंद, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; सरवडे पट्ट्यातील गावे हादरली

By विश्वास पाटील | Updated: November 29, 2022 12:01 IST

...यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कोल्हापूर: जीवनावश्यक दैनंदिन किराणा माल तसेच किरकोळपासून मोठ्यात मोठ्या आजारांसाठी लागणारी औषधे स्वस्तात देण्याचा आणि केलेल्या गुंतवणूकीचा आकर्षक परतावा देण्याचा भुलभुलैय्या करणाऱ्या एका स्टोअर कंपनीचा हत्ती आता चिखलात रुतला आहे. यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कमी गुंतवणीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरवातीला बक्कळ पैसा मिळवायचा आणि मग अचानक गाशा गुंडाळून परागंदा व्हायचे हाच फॉर्मुला वापरून साधारणतः चार-पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या स्टोअर या कंपनीचाही प्रवास आता याच मार्गाने सुरु झाला आहे. कंपनीचे मालक या महिन्याअखेर कंपनी नव्या जोमाने सुरु होणार असल्याचा व मिळालेला परतावा वजा करून राहिलेली रक्कम देणार असल्याचा विश्र्वास देत आहेत परंतू प्रत्यक्षात तसे कांही घडताना दिसत नाही. अन्य कंपन्यानुसारच ज्यांनी सुुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले आहेत. परतावा तरी मिळत होताच शिवाय दुकाने सुरु झाल्याने तिथे स्वस्तात माल मिळत असल्याने लोकांचा जास्त विश्र्वास बसला. कारण फायदा थेटच अनुभवताच येत होता. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतापर्यंत किराणा माल कमी दरात मिळावा ही सर्वांचीच हाव असते. वाढत्या आजारांच्या फैलावामुळे औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची चिंता सर्वांनाच सतावते. अन्न आणि औषधे स्वस्तात देण्याचा फंडा ओळखून या कंपनीने गोवामार्गे राज्यात पाऊल टाकले. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा तोंडातोंडी प्रसार झाल्याने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.

नवीन गुंतवणूकदार जमा करणाऱ्यांना आकर्षक कमिशन होते त्यामुळे गावागावात एजंट तयार झाले. साखळी पद्धतीने वाढणारी ही योजना वर्षभरात घराघरांत पोहचली. शेतकऱ्यांपासून ते पुढाऱ्यांपर्यंत आणि शिपायांपासून ते डॉक्टर, वकिलांपर्यंत नऊ हजार ते पाच लाख रुपयांची सरासरी गुंतवणूक केल्याचे दिसते.

 असा होता गुंतवणूकीचा फॉर्मुला... -कंपनीने केलेल्या योजनेनुसार ९ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत यात गुंतवणूक करण्याची मुभा होती. नऊ हजारांच्या गुंतवणूकीसाठी प्रतिमहिना ८२५ रुपये परतावा ३६  महिने दिला जात होता..याच पटीत केलेल्या गुंतवणूकीसाठी परतावा मिळत होता. किराणा माल खरेदी करताना नऊ हजाराच्या गुंतवणूकीवर वार्षिक २२०० रुपयांचे भेट कूपन मिळणार होते. तेवढ्या रक्कमेवर ३३ टक्के सूट दिली जात असे. किराणाशिवाय औषधे खरेदी करणाऱ्यांसाठीही अशीच सवलत होती.

डोक्यावर पावशेर तेल.. - दिवाळीत या स्टोअर्समधून २८०० रुपयांचा खाद्य तेलाचा कॅन २२०० रुपयांना मिळत होता. त्यामुळे लोकांची हे कॅन न्यायला झुंबड उडत असे. त्यावेळी स्वस्तात मिळतात म्हणून तेलाचे कॅन पळवणारे आता परतावे मिळत नाहीत म्हणून झोपताना डोक्यावर पावशेर तेल घालून शांतता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या पट्ट्ट्यात गावेच्या गावे -या स्टोअर्समध्ये मुख्यत: आकनूर, सरवडे,नरतवडे, कासारवाडा, गारगोटीमध्ये जास्त गुंतवणूक झाली. त्यातही गुंतवणूक करणारा मुख्यत: प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रमाण जास्त होते.

व्यवहार झाले ठप्प.. -मुदाळतिठ्ठा, बिद्री, कूर, गारगोटी आणि कोल्हापूरातही तीन-चार ठिकाणी स्टोअर्स सुरु झाले होते. सरवडे येथे बिल्डींग घेतली. माल ठेवण्यासाठी रॅकही घेतले परंतू स्टोअर्स सुरु झाले नाही. या स्टोअर्सना प्रत्यक्षात कुलुपे लागलेली नसली तरी जूनपासून तेथील विक्री पुरती थंडावली आहे. गुळाचे रवे व तत्सम स्वरुपाचे न खपलेले साहित्य आता या स्टोअर्समध्ये पडून आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय