शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आमदार, खासदार, मंत्र्यांचा पाणीपुरवठा बंद करा; कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:51 IST

केएमटीचे २२ पैकी दोन मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोल्हापूर : हद्दवाढीस विरोध करणाऱ्या गावातील केएमटी बससेवा तत्काळ बंद करा अन्यथा १२ सप्टेंबरपासून एकही केएमटी बस बाहेर पडू देणार नाही. शास्त्रीनगरातील वर्कशॉपला टाळे ठोकले जाईल, असा इशारा शहर हद्दवाढ कृती समितीने बुधवारी महानगरपालिकेला दिला. शहरात राहून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरातील पाणीपुरवठाही बंद करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय येथील सेवा, स्मशानभूमी, अग्निशमन सेवाही बंद कराव्यात, अशी आग्रही मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या करातून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सुविधा देण्याचे काहीच कारण नाही. या गावांतील सांडपाणी शहरात येते त्याच्या प्रक्रियावर पालिका खर्च करते हा खर्चही त्यांच्याकडून वसूल करावा, असेही काहींनी सूचविले.

हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी ग्रामीण भागातील सुविधा बंद करण्याबाबत चर्चा केली. शास्त्रीय मानदंडाप्रमाणे दरडोई लागणारी जमीन शासनाने आम्हाला द्यावी, आम्हाला उभा विकास नको. हद्दवाढ होणे गरजेचे असताना प्रशासन ठोसपणे प्रस्ताव पाठवून राज्य शासनाला का पटवून देत नाही. ग्रामीण जनतेशी का संवाद साधत नाही, अशी विचारणाही करण्यात आली.

ग्रामीण भागातील तोट्यातील केएमटीची बस सेवा बंद करावी अशी मागणी यापूर्वी केली होती, तरीही ती बंद केली जात नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे सांगत ही बससेवा बंद नाही झाली तर १२ सप्टेंबरला यंत्रशाळेला टाळे ठोकले जाईल, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले. रमेश मोरे यांनी वैद्यकीय सुविधाही ग्रामीण जनतेसाठी बंद करा, असे सांगितले. यावेळी आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल कदम, संदीप देसाई, दिलीप देसाई, किशोर घाडगे यांनी बाजू मांडली.

प्रधान सचिवांसमवेत चर्चा शक्य

हद्दवाढीबाबत शासनास प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होत आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्यांना हद्दवाढीबाबत माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. केएमटीसह अन्य सुविधा बंद करण्याबाबत संबंधित विभागाकडून माहिती मागविली आहे. केएमटी जेथे बंद करणे शक्य आहे, तेथे लवकर निर्णय घेतले जातील. परंतु वैद्यकीय सेवा बंद करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दोन रुट बंद करण्याची प्रक्रिया

केएमटीचे २२ पैकी दोन मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्य मार्गावरील जमा-खर्चाची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतले जाईल, असे अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक टीना गवळी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर