शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

केसरी कार्डधारकांची चेष्टा थांबवा

By admin | Updated: December 11, 2014 23:44 IST

‘जनशक्ती’ची मागणी : सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन; १५ किलो धान्य मिळावे

कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायदा लागू झाल्यापासून केशरी कार्डधारकांच्या धान्याची नाकाबंदी केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत केवळ चार किलो धान्य दिले आहे. या कार्डधारकांची झोळी रिकामी न ठेवता त्यांना पूर्ववत १५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन येथील कोल्हापूर जनशक्तीतर्फे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे यांना नुकतेच देण्यात आले. अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लागू झाली आहे. कोल्हापूर शहरातील १ लाख ४३ हजार ७२ कार्डधारकांपैकी ७८ हजार ३५८ कार्डधारक या योजनेच्या बाहेर फेकले गेले आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणे धान्य देण्याचे जाहीर करूनही शासनाने गेल्या सहा महिन्यांत या कार्डधारकांची बोळवण केली आहे. म्हणूनच काल, बुधवारी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यांचे निवेदन दिले.केशरी कार्डधारकांना पूर्ववत १५ किलो धान्य द्यावे, अन्नसुरक्षा लाभार्थ्यांचा सर्व्हे सदोष असून, त्याचे फेरसर्वेक्षण करावे, दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय कुटुंबांना प्रतिकुटुंब ३५ किलो धान्य द्यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळाशी बोलताना देशपांडे यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, आपले म्हणणे यापूर्वी शासनाकडे पाठविले आहे. अन्नसुरक्षा लाभार्थी यादी अंतिम नसून, जे कोणी लाभार्थी वंचित आहेत, त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावेत, त्यांचा समावेश करून घेण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळात समीर नदाफ, दिलीप पाटील, एम. डी. कुंभार, तय्यब मोमीन, राजन पाटील, तुकाराम भालेकर, बाळासो शारबिद्रे, संतोष आयरे, रियाज कागदी, बादशाह सय्यद, आदींचा समावेश होता.