शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ढवळून काढणारा प्रचारच नाही सीमाभागातील वातावरण : मोजक्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:31 IST

बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात

समीर देशपांडे ।बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे. कोल्हापूर आणि परिसरातील निवडणुकीच्या वातावरणापेक्षा तर हे वातावरण शांतच वाटते.बेळगावपासून जवळच असलेल्या खानापुरात आम्ही गेलो तर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. अरविंद पाटील आणि विलास बेळगावकर या उमेदवारांच्या कार्यालयात निवडक कार्यकर्ते बसून होते. उमेदवार ग्रामीण भागात प्रचाराला गेले होते. मधूनच दोन चार पक्षाचे झेंडे लावलेल्या गाड्या ये-जा करत होत्या. बेळगावमध्येही कुठेही फार मोठ्या पदयात्रा दिसून आल्या नाहीत. दिवसभर ऊन म्हणून संध्याकाळी वातावरण तापेल म्हटले तरी अगदी मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार भेटी देत असल्याचे दिसून आले. कुठेही जंगी पदयात्रा काढण्यात आल्याचे चित्र दिसत नव्हते. हुक्केरीमध्ये मात्र रिक्षा आणि जीपमधून गाण्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू होता.गाड्यांना झेंडे लावले होते आणि रेकॉर्ड केलेली आवाहनाची कन्नड गाणी येथे ऐकायला मिळाली. चिकोडीमध्येही यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते. मात्र निपाणीत आल्यानंतर वातावरणात फरक पडला. या ठिकाणी काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दुसरीकडे आमदार शशिकला जोल्ले यांनी चारचाकी गाडीला रथासारखा आकार दिला होता, ती गाडी दिसत होती. काका पाटील यांच्या प्रचारासाठी एक मराठी शाहीर पथकच कार्यरत असल्याचे येथे दिसून आले. सुशीलकुमार शिंदेंच्या प्रचारसभेसाठी आवाहन केले जात होते. निपाणीत आल्यानंतर निवडणुकीचा माहोल वाटत होता. शेवटच्या टप्प्यात वातावरणनिर्मिती आता शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचाराची आखणी उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. आतापर्यंत छोटी छोटी गावे संपवून शेवटच्या टप्प्यात मोठ्या मोठ्या गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडेल, असे चित्र आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८